GBS Treatment : कमला नेहरू रुग्णालयात 'जीबीएस'च्या रुग्णांवर मोफत उपचार

  56

पुणे : गेल्या काही दिवसांपासून शहरात वाढत असलेली ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ (जीबीएस) च्या रुग्णांची संख्या पाहता महापालिकेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात जीबीएस च्या रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. या आजाराचे खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना महापालिकेच्या ‘शहरी गरीब योजने’अंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतची मदत देखील केली जाणार आहे.



पुणे शहरातील सिंहगड रस्त्यावरील खडकवासला, किरकिटवाडी, डीएसके विश्व यासह आजुबाजुच्या परिसरात जीबीएस रुग्णांची संख्या वाढत आहे. या भागातील नागरिकांना ज्या विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो ते पाणी दुषित असल्याने या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचा आरोप या भागातील नागरिकांकडून केला जात आहे. या रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या