पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी (Pandharpur Vitthal Temple) राज्यभरातून लाखो भाविक येतात. तसेच विवाह झाल्यानंतर नवविवाहित जोडपे देवदर्शनासाठी जात असतात. अशातच पंढरपुरातील विठुरायाचे दर्शनला जाणाऱ्या जोडप्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने नवविवाहित जोडप्यांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ज्यामुळे लग्नानंतर विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या नवविवाहित जोडप्यांना दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे राहण्याची आवश्यकता राहणार नाही.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीमध्ये दिव्यांगांच्या बरोबरच नवविवाहित जोडप्यांना व्हीआयपी दर्शन देण्याचा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी नवविवाहित जोडप्यांना विठुरायाच्या दर्शनासाठी मोठ्या रांगेत उभे राहावे लागत होते. मात्र आता या निर्णयामुळे पंढरपूरमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या नवविवाहित जोडप्याला विठुरायाचे लागलीच व चांगले दर्शन घेता येणार आहे.
त्याचबरोबर पंढरपुरातील स्थानिक नागरिकांना देखील सकाळी सहा ते सात आणि रात्री दहा ते साडेदहा वाजेपर्यंत दर्शनाला सोडले जाणार आहे. अर्थात यामुळे दर्शनासाठी होणारी गर्दी कमी होऊ शकेल. याची अंमलबजावणी गुरुवारपासून म्हणजे २९ जानेवारीपासून करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…