Pandharpur Vitthal Temple : नवविवाहित जोडप्यांना मिळणार विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन!

पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी (Pandharpur Vitthal Temple) राज्यभरातून लाखो भाविक येतात. तसेच विवाह झाल्यानंतर नवविवाहित जोडपे देवदर्शनासाठी जात असतात. अशातच पंढरपुरातील विठुरायाचे दर्शनला जाणाऱ्या जोडप्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने नवविवाहित जोडप्यांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ज्यामुळे लग्नानंतर विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या नवविवाहित जोडप्यांना दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे राहण्याची आवश्यकता राहणार नाही.



विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीमध्ये दिव्यांगांच्या बरोबरच नवविवाहित जोडप्यांना व्हीआयपी दर्शन देण्याचा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी नवविवाहित जोडप्यांना विठुरायाच्या दर्शनासाठी मोठ्या रांगेत उभे राहावे लागत होते. मात्र आता या निर्णयामुळे पंढरपूरमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या नवविवाहित जोडप्याला विठुरायाचे लागलीच व चांगले दर्शन घेता येणार आहे.



स्थानिक नागरिकांसाठीही वेळ निश्चित


त्याचबरोबर पंढरपुरातील स्थानिक नागरिकांना देखील सकाळी सहा ते सात आणि रात्री दहा ते साडेदहा वाजेपर्यंत दर्शनाला सोडले जाणार आहे. अर्थात यामुळे दर्शनासाठी होणारी गर्दी कमी होऊ शकेल. याची अंमलबजावणी गुरुवारपासून म्हणजे २९ जानेवारीपासून करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये