बचत गटाच्या महिलांना देणार आता सायबर सुरक्षेचे धडे

मुंबई: मागील काही दिवसांत सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या सदस्यांना सायबर सुरक्षेबाबत जागरूक करणे आणि सुरक्षित डिजिटल व्यवहारासाठी ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद आणि एमकेसीएलच्या वतीने महिला सायबर साक्षर अभियान संयुक्तपणे राबविण्यात येणार आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार १०० दिवस कृती कार्यक्रम अंमलबजावणी अंतर्गत जिल्हा परिषदेच्या वतीने अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या माध्यमातूनच महिलांसाठी सायबर साक्षर हा उपक्रम राबविण्यात येत आहे.या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील उमेद अभियानांतर्गत ६८ महिला प्रभाग संघाशी जोडलेल्या २६ हजार बचत गटात सहभागी असणार्‍या अडीच लाख महिलांना एमकेसीएलच्या अधिकृत अध्ययन केंद्रांमध्ये (एएलसीएस) जाऊन सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन दिले जाणार आहे.



महिला दिनापर्यंत यातील किमान १ लाख महिलांना सायबर साक्षर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. १ फेब्रुवारी ते ८ मार्चदरम्यान सायबर सुरक्षा जागरूकता अभियान राबविण्यात येणार असून, त्यांची नोंदणी २६ ते ३१ जानेवारीदरम्यान tinyurl. com/ ssadrdapune या लिंक करावी लागणार आहे.

Comments
Add Comment

Water Metro Project: मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार; लवकरच सुरु होणार 'जल मेट्रो प्रकल्प'

मुंबई: मुंबईच्या दैनंदिन वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची लवकरच सुटका होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. खासदार

मुंबईतील गोरेगावात ४५ मजली इमारतीला भीषण आग

मुंबई: मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या ४५ मजली इमारतीला भीषण आग लागली आहे. या इमारतीच्या नवव्या मजल्यावर

पहिल्या महापालिका सभेत मुख्यमंत्र्यांच्या समक्ष भाजप नगरसेवकांचे घडले असे दर्शन

मुंबई :  मुंबई महापालिकेत मागील पाच वर्ष केवळ पहारेकरी म्हणून काम करणाऱ्या भाजपने खऱ्या अर्थाने विरोधी पक्षाची

जे जे उड्डाणपूलाखाली परिसरातील वर्षानुवर्षांच्या कचऱ्यांसह अतिक्रमणांची जळमटेही केली दूर

मुंबई : दक्षिण मुंबईतील जे जे उड्डाणपूलाखालील भागात मागील काही वर्षांपासून अतिक्रमण होऊन मोठ्याप्रमाणात

मंत्रालयात लाच घेताना लिपिकाला अटक

मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिकाला लाच घेताना मंत्रालयात सापळा रचून मोठी कारवाई केली. राजेंद्र ढेरंगे

रेस्टॉरंट्सकडून 'सर्व्हिस चार्ज' आकारणी; मुंबई ग्राहक पंचायतीची कारवाईची मागणी

मुंबई  : 'सर्व्हिस चार्ज देणे हे सक्तीचे नसून तो देणे हा ग्राहकांच्या पूर्णपणे स्वेच्छेवर अवलंबून असताना