बचत गटाच्या महिलांना देणार आता सायबर सुरक्षेचे धडे

मुंबई: मागील काही दिवसांत सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या सदस्यांना सायबर सुरक्षेबाबत जागरूक करणे आणि सुरक्षित डिजिटल व्यवहारासाठी ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद आणि एमकेसीएलच्या वतीने महिला सायबर साक्षर अभियान संयुक्तपणे राबविण्यात येणार आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार १०० दिवस कृती कार्यक्रम अंमलबजावणी अंतर्गत जिल्हा परिषदेच्या वतीने अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या माध्यमातूनच महिलांसाठी सायबर साक्षर हा उपक्रम राबविण्यात येत आहे.या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील उमेद अभियानांतर्गत ६८ महिला प्रभाग संघाशी जोडलेल्या २६ हजार बचत गटात सहभागी असणार्‍या अडीच लाख महिलांना एमकेसीएलच्या अधिकृत अध्ययन केंद्रांमध्ये (एएलसीएस) जाऊन सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन दिले जाणार आहे.



महिला दिनापर्यंत यातील किमान १ लाख महिलांना सायबर साक्षर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. १ फेब्रुवारी ते ८ मार्चदरम्यान सायबर सुरक्षा जागरूकता अभियान राबविण्यात येणार असून, त्यांची नोंदणी २६ ते ३१ जानेवारीदरम्यान tinyurl. com/ ssadrdapune या लिंक करावी लागणार आहे.

Comments
Add Comment

शाहरुख, सलमानला भेटा, 50 रुपयांत वांद्रयात फिरा

सध्या सगळीकडेच महागाई प्रचंड वाढली आहे. त्यामुळे अनेकांना वाटतं की मुंबईत फिरणं म्हणजे आपल्याला काही परवडणार

Mumbai: चेंबूरमधील संतापजनक घटना; एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

मुंबई: मुंबईत एक संतापजनक घटना समोर आली आहे. चेंबूरच्या टिळक नगर परिसरात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार

मुंबई : राज्याच्या ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यमंत्री मेघना

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या आनंदाची बातमी, १ जूनपासून...

मुंबई: मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या कोकणवासियांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील ८६४ पुनर्वसन सदनिकांचे वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार

मुंबई: आशियातील नागरी पुनरुत्थानाच्या सर्वात मोठ्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील नायगाव येथील

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पुन्हा घुमली 'वनराणी'ची शिट्टी

- बॅटरीवर चालणाऱ्या इंजिनासह आधुनिक सेवा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई :