Saif Ali Khan Attack Update : सैफ अली खान हल्ला प्रकरणी आता एका बांगलादेशी महिलेला अटक

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सैफ अली खानवर १६ जानेवारी रोजी झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि तो बरा झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली. मात्र, पोलिसांनी अटक केलेली व्यक्ती चुकीची व्यक्ती असल्याचं म्हटलं जात आहे. त्यानंतर पोलिसांनी आता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात एका बांगलादेशी महिलेला अटक केल्याची माहिती समोर आली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत यापूर्वी अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकानं वापरलेलं सिम कार्ड एका महिलेच्या नावावर असल्याचं समोर आलं आहे.सैफ अली खान प्रकरण्यातील धागे-दोरे शोधण्यासाठी टीम रविवारी बंगालला पोहोचली. तिथून चापडा जिल्ह्यातून त्यांनी एका महिलेला अटक केल्याची माहिती समोर आली आहे. या महिलेचं नाव खुखुमोनी जहांगीर शेर असल्याचं सांगितलं जात आहे. त्यासोबतच ही महिला बांगलादेशी आरोपी शरीफुलच्या परिचयाची असल्याचं सांगितलं जात आहे.


पोलिसांनी अटक केलेला आरोपी शरीफुल बांगलादेशाच्या सीमेवरुन भारतात अवैधरित्या घुसला होता. त्यावेळी याच महिलेशी त्यानं संपर्क साधला होता. महिला बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्याच्या अंदुलियात राहणारी आहे. पोलिसांनी सोमवारी महिलेला अटक केली असून मुंबई रिमांडवर घेऊन गेली आहे. दरम्यान, यासंदर्भात पोलिसांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. अशातच आता या प्रकरणाशी महिलेचा नेमका संबंध काय? हे महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

अवैध प्रवासी वाहतुकीवर आळा घालण्यासाठी कडक भूमिका घेणार - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : राज्यातील वाढत्या अवैध प्रवासी वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या

Nitish Kumar: नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतरही झेड+ सुरक्षा राहणार; नेमकं कारण काय?

नवी दिल्ली: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सुरक्षेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्रीपद

BMC News : मुंबईतील सर्व ऑक्सिजन प्लांटचे ऑडीट करा; स्थायी समितीने दिले निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) कोविड काळात मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालये तसेच कोविड

BMC News : वाणीतून नाहीतर भाजपाने करून दाखवले; सुमारे २७० कोटी रूपयांची बचत करत गारगाई पाणी प्रकल्पाला दिली मंजुरी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) स्थायी समितीने फेरविचारासाठी पाठवून दिलेला गारगाई पाणी प्रकल्पाला अखेर स्थायी समितीने

मुंबईतील १९८५ ते २०२५ पर्यंतच्या आरक्षित वास्तूंचा शोध घ्या, कागदपत्रे तपासा; महापौरांचे प्रशासनाला आदेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : सार्वजनिक सुविधा, समाज कल्याण केंद्र, निवासी आरक्षण असलेल्या महानगरपालिकेच्या वास्तू,

अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी है तो सब मुनकीन है

लक्ष्यापेक्षा २७० कोटी रुपयांची मालमत्ता कराची अधिकची वसुली मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या