वसईत क्रिकेट खेळताना एका २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

वसई : वसईच्या कोपर गावात क्रिकेट खेळताना एका २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गावातील मैदानावर क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे.तरुणाला तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आलं. पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सागर वझे असे या मृत क्रिकेटपटूचे नावं आहे. तो अवघा २७ वर्षांचा होता. चांगला खेळाडू अशी सागर वझेची पंचक्रोशीत ओळख होती. शुक्रवारी संध्याकाळी गावच्या पोरांच्यात सामना सुरू झाला. सचिन सामना खेळण्यासाठी मैदानात पोहोचला.सचिनने सामन्यात दोन बॉलवर दोन सिक्स मारले. त्यानंतर तिसरा सिक्स मारण्याची मागणी प्रेक्षकांकडून होऊ लागली. पण तिसरा सिक्स मारण्यासाठी पुढे आला आणि त्याचवेळी त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला.



सागर जागीच कोसळला आणि उपचारासाठी दवाखान्यात नेईपर्यंत त्याचा मृत्यू झाला. सागरला यापूर्वीही एकदा हृदयविकाराचा झटका येऊन गेला होता. डॉक्टरांनी त्याला क्रिकेटपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. परंतु, क्रिकेटवरील प्रेमापोटी त्याने पुन्हा खेळण्यास सुरुवात केली आणि दुर्दैवाने खेळतानाच त्याने प्राण सोडला.

Comments
Add Comment

महाविद्यालयीन शुल्कातील गैरप्रकारांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत घोषणा; दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे संकेत मुंबई :

'गॅस तुटवड्याविषयी सरकारने उपाययोजना कराव्यात'

मुंबई : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासह राज्यात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचे पडसाद बुधवारी

नागरिकांना विनासायास डिजिटल सेवा मिळण्यासाठी व्यापक धोरण तयार करा; माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय ई-सेवा आणि आधार संबंधित सेवा कोणत्याही अडथळ्याविना मिळाव्यात,

माजी सैनिक आणि भूमिहीनांच्या जमिनी वर्ग १ होणार, महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा

मुंबई : राज्यातील माजी सैनिक, भूमिहीन शेतकरी आणि शेतमजुरांना महाराष्ट्र शेत जमीन (सीलिंग) अधिनियमांतर्गत वाटप

प्रवासी आरक्षण सेवा इतके तास बंद राहणार

मुंबई : मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) दिनांक १२.०३.२०२६ रोजी २३.४५ वाजल्यापासून दिनांक १३.०३.२०२६ रोजी

एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! महामंडळात १७,७४२ पदांची होणार जंगी भरती

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी)