वसईत क्रिकेट खेळताना एका २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

वसई : वसईच्या कोपर गावात क्रिकेट खेळताना एका २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गावातील मैदानावर क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे.तरुणाला तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आलं. पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सागर वझे असे या मृत क्रिकेटपटूचे नावं आहे. तो अवघा २७ वर्षांचा होता. चांगला खेळाडू अशी सागर वझेची पंचक्रोशीत ओळख होती. शुक्रवारी संध्याकाळी गावच्या पोरांच्यात सामना सुरू झाला. सचिन सामना खेळण्यासाठी मैदानात पोहोचला.सचिनने सामन्यात दोन बॉलवर दोन सिक्स मारले. त्यानंतर तिसरा सिक्स मारण्याची मागणी प्रेक्षकांकडून होऊ लागली. पण तिसरा सिक्स मारण्यासाठी पुढे आला आणि त्याचवेळी त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला.



सागर जागीच कोसळला आणि उपचारासाठी दवाखान्यात नेईपर्यंत त्याचा मृत्यू झाला. सागरला यापूर्वीही एकदा हृदयविकाराचा झटका येऊन गेला होता. डॉक्टरांनी त्याला क्रिकेटपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. परंतु, क्रिकेटवरील प्रेमापोटी त्याने पुन्हा खेळण्यास सुरुवात केली आणि दुर्दैवाने खेळतानाच त्याने प्राण सोडला.

Comments
Add Comment

मालाडमधील फोर डायमेंशन इमारतीला आग

मुंबई: मालाड पश्चिम येथील माइंडस्पेसजवळ लिंक रोडवरील फोर डायमेंशन बिल्डिंगमध्ये शुक्रवारी आग लागली. मुंबई

मुंबईच्या काळाचौकी परिसरात रक्तरंजित थरार!

प्रेमभंगातून तरुणाचा प्रेयसीवर जीवघेणा हल्ला, नंतर स्वतः केली आत्महत्या मुंबई : मुंबईतील काळाचौकी भागात एक खूप

हातपाय बांधले आणि चोर समजून तरुणाला मरेपर्यंत मारले

मुंबई : चोर सोडून संन्याशाला फाशी ही म्हण मुंबईतील गोरेगावमध्ये काही प्रमाणात खरी ठरली. गोरेगावच्या तीन डोंगरी

मुंबईतील स्ट्रीट फर्निचरच्या कंत्राट कामांना बोनस, आणखी वाढवून दिली एवढ्या कोटींची रक्कम

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेच्या प्रशासकांच्या काळात मंजूर झालेल्या वादग्रस्त स्ट्रीट फर्निचरची कामे

Kalachowki News : मुंबई हादरली! दिवसाढवळ्या भररस्त्यात काळाचौकी परिसरात तरुणीवर चाकूने हल्ला, आरोपीने स्वतःचाही गळा चिरला!

मुंबई : मुंबईतील (Mumbai) काळाचौकी (Kalachowki) परिसरात आज, शुक्रवारी सकाळी एक अत्यंत धक्कादायक आणि हादरवून टाकणारी घटना घडली

मुंबईकरांनी दिवाळीत फटाक्यांसह केला कचरा, महापालिकेने तब्बल ३,००० टन जमा केला..

मुंबई (खास प्रतिनिधी): दीपावलीच्या पूर्वी करण्यात आलेली साफसफाई आणि या सणाच्या काळात भेटवस्तू तसेच फटाक्यांचा