UCC in Uttarakhand : उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू!

डेहराडून : उत्तराखंडमध्‍ये आजपासून समान नागरी कायदा लागू झाला आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी 'यूसीसी'च्या पोर्टल आणि नियमांचे उद्घाटन केले. त्याचबरोबर त्याची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. उत्तराखंड हे समान नागरी संहिता लागू करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे.



उत्तराखंडमध्‍ये २७ मे २०२२ रोजी समान नागरी संहितेसाठी तज्ञ समितीची स्थापना करण्यात आली होती. समितीने २ फेब्रुवारी २०२४ रोजी सरकारला आपला अहवाल सादर केला. यानंतर, ८ मार्च २०२४ रोजी विधानसभेत हे विधेयक मंजूर झाले. विधानसभेतून मंजूर झाल्यानंतर ते राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आले. येथून १२ मार्च २०२४ रोजी राष्ट्रपतींची मान्यता कायद्याला मिळाली. समान नागरी कायदा अंमलबजावणीसाठी तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली लागू करण्यात आल्या. नागरिक आणि अधिकाऱ्यांसाठी ऑनलाइन पोर्टल विकसित करण्यात आले. गेल्या २० जानेवारी रोजी, मंत्रिमंडळाने यूसीसी नियमांना अंतिम रूप दिले आणि ते मंजूर केले होते. शुक्रवारी झालेल्या मॉक ड्रिलमध्ये यापूर्वी येणाऱ्या समस्या सोडवण्यात आल्या. दुपारी १२.३० वाजता यूसीसी नियम आणि कायदे देखील लाँच करण्यात आले.


मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी यूसीसीच्या पोर्टल आणि नियमांचे उद्घाटन केले. यावेळी धामी म्हणाले की, हा केवळ आपल्या राज्यासाठीच नाही तर देशासाठीही ऐतिहासिक दिवस आहे. राज्‍यात क्षणापासून समान नागरी कायदा लागू होत आहे. सर्व नागरिकांना समान हक्क मिळत आहेत. सर्व धर्मातील महिलांचे हक्कही समान होत आहेत. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानतो, त्यांच्या पाठिंब्यामुळेच सर्व घडत आहे. मी न्यायमूर्ती प्रमोद कोहली आणि समितीचे आभार मानतो. सर्व विधानसभेच्या सदस्यांचे आभार. आयकर विभाग आणि पोलिस गृह विभागाचे आभार. आम्ही तेच करण्याचा संकल्प केला आहे. त्याने दिलेले वचन पूर्ण केले, असेही धामी यांनी यावेळी नमूद केले.

Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे