मुंबईसह नवी मुंबई विमानतळ मेट्रो मार्गाने जोडले जाणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती


मुंबई : मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी कार्यभार हाती घेतल्यानंतर तातडीने राज्यातील विकासकामांना वेग देण्यास त्यांनी सुरूवात केली आहे. मुंबई आणि नवी मुंबईसह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात अखंड कनेक्टिव्हिटी निर्माण करण्याच्या दिशेने काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले आहेत. यामध्ये मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नव्याने प्रवाशांसाठी खुले होणारे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या दोन प्रमुख विमानतळांना मेट्रो मार्ग ८ (सीएसएमआयए ते एनएमआयए) ने जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


हा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर विकसित करण्यास शासनाने तत्वतः मान्यता दिली असून या प्रकल्पाच्या सुसाध्यता अहवालाची तयारी सिडकोमार्फत केली जाणार आहे. यासाठी संपूर्ण प्रकल्प अहवाल सिडकोने तयार करावा, असे निर्देश एमएमआरडीएला देण्यात आले आहेत.



मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या विमानतळांच्या आजूबाजूला प्रमुख आर्थिक केंद्रांचा विकास होत असून भविष्यात या भागात आंतरजोडणीची आवश्यकता अधिक महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे या विमानतळांमधील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी तसेच येथील रस्ते व रेल्वे जाळ्याचे सुधारणा करण्यासाठी मेट्रो मार्ग ८ हा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.


मुंबई मेट्रो मार्ग ८ ची लांबी बहुसंख्येने नवी मुंबई परिसरातूनच जाईल आणि तोपर्यंत नवी मुंबई विमानतळ सिडकोमार्फत विकसित होणार आहे. प्रकल्प अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून शासनाच्या मंजुरीसाठी संबंधित प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देशही सिडकोला देण्यात आले आहेत. या मेट्रो मार्गामुळे मुंबई महानगर क्षेत्राच्या कनेक्टिव्हिटीमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा होईल आणि भविष्यात प्रवाशांच्या प्रवासाची सोय अधिक सुलभ होईल असे मानले जाते.

Comments
Add Comment

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या