Pune-Bhor Accident : पुण्यात अपघात, कार १०० फूट दरीत कोसळली, एकाचा मृत्यू, ८ गंभीर जखमी

पुणे : भोर - महाड मार्गावर वरंध घाटात अपघात झाला. कार १०० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला. अपघातात आठ जण गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी पोलिसांच्या सहकार्याने मदतकार्य केले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले.


पुण्यातील भोर - महाड मार्गावर सोमवारी पहाटे चारच्या सुमारास वरंध घाटात अपघात झाला. इको कार महाडहून पुण्याच्या दिशेला जात होती. कार उंबरठे गावाजवळच्या रस्त्यावरुन पुढे जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे इको कार १०० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात २२ वर्षीय तरुण जागीच ठार झाला असून बाकी ८ जण गंभीर जखमी आहेत.



अपघाताची माहिती मिळताच स्थानिक शिरगांव रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या मदतीने जखमींना दरीतून बाहेर काढलं. जखमींना तात्काळ दरीतून बाहेर काढून, रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. स्थानिक शिरगाव रेस्क्यू टीम आणि पोलिसांनी बचाव कार्य केले. पोलीस अपघात प्रकरणी पुढील कारवाई करत आहेत.

Comments
Add Comment

Jalgaon : दोघांचा अपघातात तर एकाचा तलावात बुडाल्याने मृत्यू , एकाच दिवशी तीन दुर्दैवी घटना घडल्याने जळगाव जिल्हा हळहळला

Jalgaon : जळगाव जिल्ह्यात बुधवारी घडलेल्या तीन वेगवेगळ्या दुर्घटनांनी जिल्हा हळहळला आहे. घडलेल्या दुर्घटनांमध्ये

Pratap Sarnaik : १ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी गिरवले मराठीचे धडे

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; मराठीचा मान राखणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्र कवेत घेईल मुंबई : "

Chandrashekhar Bawankule : नार्को टेस्ट करण्यास मी तयार!

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मनोज जरांगेंच्या आरोपांवर दिले सडेतोड उत्तर मुंबई :

Ashok Kharat Case : हाताला लकवा तरी..., भोंदू खरातचा आणखी एक कारनामा उघड

Ashok Kharat Case : समता पतसंस्थेच्या राहाता शाखेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) याने पैशांचा भरणा

Devendra Fadnavis : जातपडताळणी समितीच्या कामकाजात राज्य सरकारचा हस्तक्षेप नाही!

मनोज जरांगेंच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण; कोणत्याही मंत्र्याने जाणीवपूर्वक प्रमाणपत्रे रद्द

Malegaon : चाळीसगाव फाटा ते शिवतीर्थ नवीन जलवाहिनीस महासभेत मंजुरी

Malegaon : ऐन पावसाळ्यात वारंवार जलवाहिनी फुटल्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत होते. यासंदर्भातील