वाल्मिक कराडची जिल्हा रुग्णालयातून जिल्हा कारागृहात रवानगी

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात तसेच या हत्येशी संबंधित एका खंडणीच्या प्रकरणात प्रमुख आरोपी असलेल्या वाल्मिक कराडची बीड जिल्हा रुग्णालयातून बीड जिल्हा कारागृहात रवानगी झाली. तब्येत बिघडल्याचे कारण दिल्यानंतर वाल्मिक कराडला बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण वाल्मिक कराडच्या तब्येतीबाबत भाजपा आमदार सुरेश धस, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांनी प्रश्न उपस्थित केले. यानंतर तब्येत बरी झाल्याचे सांगत वाल्मिक कराडला बीड जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज्ड देण्यात आला. रुग्णालयाने सोडताच वाल्मिक कराडची लगेच बीड जिल्हा कारागृहात रवानगी झाली. सध्या वाल्मिक कराड बीड जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. तो बीड जिल्हा कारागृहाचा कच्चा कैदी आहे.



बुधवारी पोटात दुखत असल्याचे कारण सांगितल्यानंतर वाल्मिक कराडला बीड जिल्हा कारागृहातून बीड जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. आता पुन्हा एकदा वाल्मिक कराडची बीड जिल्हा कारागृहात रवानगी झाली आहे. मुंबईमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आक्रोश मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी बोलताना वाल्मिक कराडसह सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित सर्व आरोपींना मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात ठेवावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली. पोटदुखी आणि स्लिप अॅप्नियासाठी आयसीयूमध्ये ठेवण्याची गरज काय ? असाही प्रश्न अंजली दमानिया यांनी उपस्थित केला होता. वाल्मिक कराडवर सुरू असलेल्या उपचारांची माहिती सार्वजनिक करावी, अशीही मागणी अंजली दमानिया यांनी केली. आक्रोश मोर्चात सहभागी झालेल्या अनेकांनी वाल्मिक कराडवर उपचार करणाऱ्यांचीही चौकशी केली पाहिजे अशी मागणी केली. यानंतर वाल्मिक कराडची पुन्हा बीड जिल्हा कारागृहात रवानगी झाली.
Comments
Add Comment

छत्रपती संभाजीनगर : फडणवीसांच्या दौर्‍याने राजकीय वातावरण तापलं

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या भाजपच्या कार्यक्रमामुळे संपूर्ण शहरात राजकीय हालचालींना

येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष

स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात अमूल्य योगदान : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत

सततच्या अपघातांमुळे नवले पूल परिसर ‘मृत्यूचा सापळा’

पाच वर्षांत २५७ अपघात; ११५ जणांचा बळी पुणे  : नवले पूल परिसरातील प्राणांतिक अपघातांची साखळी थांबण्याचे नाव घेत

‘डॉक्टर नसलो,… पण मोठी ऑपरेशन मी करतो!’

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाबळेश्वरमध्ये जोरदार फटकेबाजी महाबळेश्वर : “मी पेशाने डॉक्टर नाही… पण

आदिवासींच्या जल, जंगल, जमीन आणि संस्कृतीचे रक्षण करू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन  राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन नागपूर : राज्य