नवी दिल्ली : भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. कर्तव्य पथावर विजय चौक ते इंडिया गेट असे संचलन झाले. पहिल्यांदाच पाच हजार कलाकारांनी ...
मागील सामन्यांप्रमाणे या सामन्यातही भारतीय गोलंदाजांनी छान कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशने वीस षटकांत आठ बाद ६४ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताने ७.१ षटकांत दोन गडी गमावून ६६ धावा केल्या आणि दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला.
बांगलादेशकडून कर्णधार सुमैया अख्तरने सर्वाधिक २१ धावा केल्या. इतर फलंदाज २० किंवा त्यापेक्षा जास्त वैयक्तिक धावा करू शकले नाही. भारताकडून वैष्णवी शर्माने १५ धावांत ३ बळी घेतले.
भारताने ६५ धावांचे लक्ष्य लिलया पार केले. गोंगडी ट्रिशाने ३१ चेंडूत ८ चौकारांसह ४० धावा केल्या. तर सानिका चाळकेने बाद ११ आणि निक्की प्रसादने नाबाद ५ धावा काढत भारताला विजय मिळवून दिला. याआधी भारतीय संघाने वेस्ट इंडिज, मलेशिया आणि श्रीलंका या संघांचा पराभव केला. सलग चार विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारणाऱ्या भारताचा पुढील सामना मंगळवार २८ जानेवारी २०२५ रोजी स्कॉटलंड विरोधात आहे.