टीम इंडियाची कमाल, मारला विजयाचा चौकार; उपांत्य फेरीत प्रवेश दिमाखदार

  51

क्वालालंपूर : प्रजासत्ताक दिनी भारताच्या १९ वर्षांखालील महिला क्रिकेट संघाने बांगलादेश विरुद्धचा सामना आठ गडी राखून जिंकला. या विजयासह सलग चार सामने जिंकणाऱ्या भारताने दिमाखात १९ वर्षांखालील टी २० महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.



मागील सामन्यांप्रमाणे या सामन्यातही भारतीय गोलंदाजांनी छान कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशने वीस षटकांत आठ बाद ६४ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताने ७.१ षटकांत दोन गडी गमावून ६६ धावा केल्या आणि दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला.



बांगलादेशकडून कर्णधार सुमैया अख्तरने सर्वाधिक २१ धावा केल्या. इतर फलंदाज २० किंवा त्यापेक्षा जास्त वैयक्तिक धावा करू शकले नाही. भारताकडून वैष्णवी शर्माने १५ धावांत ३ बळी घेतले.



भारताने ६५ धावांचे लक्ष्य लिलया पार केले. गोंगडी ट्रिशाने ३१ चेंडूत ८ चौकारांसह ४० धावा केल्या. तर सानिका चाळकेने बाद ११ आणि निक्की प्रसादने नाबाद ५ धावा काढत भारताला विजय मिळवून दिला. याआधी भारतीय संघाने वेस्ट इंडिज, मलेशिया आणि श्रीलंका या संघांचा पराभव केला. सलग चार विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारणाऱ्या भारताचा पुढील सामना मंगळवार २८ जानेवारी २०२५ रोजी स्कॉटलंड विरोधात आहे.
Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी