टीम इंडियाची कमाल, मारला विजयाचा चौकार; उपांत्य फेरीत प्रवेश दिमाखदार

क्वालालंपूर : प्रजासत्ताक दिनी भारताच्या १९ वर्षांखालील महिला क्रिकेट संघाने बांगलादेश विरुद्धचा सामना आठ गडी राखून जिंकला. या विजयासह सलग चार सामने जिंकणाऱ्या भारताने दिमाखात १९ वर्षांखालील टी २० महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.



मागील सामन्यांप्रमाणे या सामन्यातही भारतीय गोलंदाजांनी छान कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशने वीस षटकांत आठ बाद ६४ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताने ७.१ षटकांत दोन गडी गमावून ६६ धावा केल्या आणि दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला.



बांगलादेशकडून कर्णधार सुमैया अख्तरने सर्वाधिक २१ धावा केल्या. इतर फलंदाज २० किंवा त्यापेक्षा जास्त वैयक्तिक धावा करू शकले नाही. भारताकडून वैष्णवी शर्माने १५ धावांत ३ बळी घेतले.



भारताने ६५ धावांचे लक्ष्य लिलया पार केले. गोंगडी ट्रिशाने ३१ चेंडूत ८ चौकारांसह ४० धावा केल्या. तर सानिका चाळकेने बाद ११ आणि निक्की प्रसादने नाबाद ५ धावा काढत भारताला विजय मिळवून दिला. याआधी भारतीय संघाने वेस्ट इंडिज, मलेशिया आणि श्रीलंका या संघांचा पराभव केला. सलग चार विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारणाऱ्या भारताचा पुढील सामना मंगळवार २८ जानेवारी २०२५ रोजी स्कॉटलंड विरोधात आहे.
Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत