टीम इंडियाची कमाल, मारला विजयाचा चौकार; उपांत्य फेरीत प्रवेश दिमाखदार

क्वालालंपूर : प्रजासत्ताक दिनी भारताच्या १९ वर्षांखालील महिला क्रिकेट संघाने बांगलादेश विरुद्धचा सामना आठ गडी राखून जिंकला. या विजयासह सलग चार सामने जिंकणाऱ्या भारताने दिमाखात १९ वर्षांखालील टी २० महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.



मागील सामन्यांप्रमाणे या सामन्यातही भारतीय गोलंदाजांनी छान कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशने वीस षटकांत आठ बाद ६४ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताने ७.१ षटकांत दोन गडी गमावून ६६ धावा केल्या आणि दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला.



बांगलादेशकडून कर्णधार सुमैया अख्तरने सर्वाधिक २१ धावा केल्या. इतर फलंदाज २० किंवा त्यापेक्षा जास्त वैयक्तिक धावा करू शकले नाही. भारताकडून वैष्णवी शर्माने १५ धावांत ३ बळी घेतले.



भारताने ६५ धावांचे लक्ष्य लिलया पार केले. गोंगडी ट्रिशाने ३१ चेंडूत ८ चौकारांसह ४० धावा केल्या. तर सानिका चाळकेने बाद ११ आणि निक्की प्रसादने नाबाद ५ धावा काढत भारताला विजय मिळवून दिला. याआधी भारतीय संघाने वेस्ट इंडिज, मलेशिया आणि श्रीलंका या संघांचा पराभव केला. सलग चार विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारणाऱ्या भारताचा पुढील सामना मंगळवार २८ जानेवारी २०२५ रोजी स्कॉटलंड विरोधात आहे.
Comments
Add Comment

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतही जसप्रीत बुमराहच अव्वल

दुबई (वृत्तसंस्था): आयसीसीने बुधवारी त्यांची ताजी क्रमवारी जाहीर केली. भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज आणि कुलदीप

महिला क्रिकेट विश्वचषक : भारतीय संघाला विजयी हॅट्ट्रिकची संधी

विशाखापट्टणम: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने

IND vs AUS : फक्त १० धावा करताच रोहित शर्मा रचणार इतिहास

पर्थ/मेलबर्न: शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन एकदिवसीय (ODI)

Asia Cup 2025 : बक्षीस मिळालेली कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकत नाही, जाणून घ्या कारण !

मुंबई : आशिया कप २०२५ मध्ये भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा याने चमकदार कामगिरी करत "प्लेअर ऑफ द टूर्नामेंट"चा किताब

IND vs PAK: वेल डन टीम इंडिया, वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला केले नेस्तनाबूत

कोलंबो: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हा रविवार पुन्हा एकदा भारताच्या नावावर राहिला. आजच्या या सामन्यात

पाकिस्तानपुढे २४८ धावांचे आव्हान

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून