काव्यरंग : केतकीच्या बनी तिथे...

केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर
गहिवरला मेघ नभी सोडला गं धीर

पापणीत साचले अंतरांत रंगले
प्रेमगीत माझिया मनामनात धुंदले
ओठांवरी भिजला गं आसावला सूर

भावफूल रात्रीच्या अंतरंगी डोलले
धुक्यांतुनी कुणी आज भावगीत बोलले
डोळियांत पाहिले कौमुदीत नाचले
स्वप्नरंग स्वप्निच्या सुरासुरांत थांबले
झाडावरी दिसला गं भारला चकोर

गीत : अशोक जी. परांजपे
स्वर : सुमन कल्याणपूर


नकोच घालू बांध मनाला


नकोच घालू बांध मनाला
अंधारातून उगवून ये
श्वासाना दे लयीत जागा
पाय जरासे दमवून घे
फार कशाला प्रश्न उशाला
स्वप्नांना दे जाग नवी
जुन्या पुराण्या अचल रूढींना
चला लाऊया आज चुढी
हसत लकेरी घेत चालली
सोंनपावली पाहट कशी
वेलीवरती दवविंदूची
लबाड लाडिक खोडी अशी
पाहा उगवला सूर्य नवा अन्
अंधार पसरला मनामध्ये
घे श्वासांना स्पंदनात अन्
साकार कर तुझे स्वप्न नवे

-दीपाली पंडित, राजापूर

Comments
Add Comment

विकतची किर्ती नको

गोष्ट लहान, मोठा अर्थ-शिल्पा अष्टमकर आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला प्रसिद्धी, मान-सन्मान आणि किर्ती हवी

उंदराचे बीळ!

कथा-रमेश तांबे एका गावात एक उंदीर अगदी मजेत राहात होता. त्याच्या कुटुंबात चार-पाच जण होते. पण गावात स्वच्छतेच्या

समुद्रात मोती कसे बनतात ?

विज्ञानकथा-प्रा. देवबा पाटील सुहलीला गेलेल्या मुलांच्या ज्ञानाच्या गप्पा मस्त चालू होत्या. “सागरी प्रवाह कसे

असा ऋतू

गड-किल्ले हे माझे अत्यंत आवडीचे ठिकाण. शाळेत असताना पहिल्यांदा पहिला गड पाहिला तो ‘रायगड’ तोही सहलीच्या

विश्वासघात

संस्कृतीचा गोडवा-पूर्णिमा शिंदे पुण्यातील कर्वेनगर येथे स्थायिक असलेले संध्या आणि विनोद शहा हे व्यापारी असतात.

बाळू

नक्षत्रांचे देणे- डॉ. विजया वाड बाळू माझा विद्यार्थी. अगदी भारी दांड. मी तेव्हा उदयाचलात पर्यवेक्षक होते. एका