तिसऱ्या मजल्यावरुन कोसळला दोन वर्षांचा चिमुरडा

डोंबिवली : एका तेरा मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन दोन वर्षांचा चिमुरडा खाली कोसळला. ही धक्कादायक घटना डोंबिवलीतील देवीचा पाडा येथे घडली. सगळा घटनाक्रम सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाला.





चिमुरडा तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडत असल्याचे लक्षात येताच भावेश म्हात्रेने त्याला हवेत झेलण्यासाठी धाव घेतली. भावेश याच इमारतीत ग्राहकाला घर दाखवण्यासाठी आला होता. घर दाखवून झाल्यावर तो ग्राहकासोबत बाहेर पडत होता. सहज इमारतीकडे बघत आवारातून बाहेर पडत असताना भावेशला चिमुरडा पडत असल्याचे लक्षात आले आणि त्याने धाव घेतली. अखेर चिमुरडा भावेशच्या हाताला लागून नंतर खाली जमिनीवर पडला. भावेशने प्रसंगावधान राखत पाय पटकन पुढे केले आणि चिमुरड्याला पायावर झेलण्याचा प्रयत्न केला. यामुळे चिमुरड्याला मोठी दुखापत झाली नाही. आजूबाजूच्या नागरिकांसह आईवडिलांनी तातडीने चिमुरड्याला डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी तपासणी करुन चिमुरडा सुखरुप असल्याचे सांगितल्यावर सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.



हाती आलेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील देवीचा पाडा परिसरात राहणारा भावेश म्हात्रे हा ३५ वर्षीय युवक घराच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करतो. तो शनिवार २५ जानेवारी रोजी दुपारी अनुराज इमारतीत ग्राहकाला घर दाखवण्यासाठी गेला होता. घर दाखवून इमारती बाहेर येत असताना याच इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरील घरातला चिमुरडा खाली पडत असल्याचे लक्षात आले आणि भावेशने धाव घेतली.



ज्या घरातून चिमुरडा पडला त्या घरात रंगकाम सुरू होते. रंगकामासाठी खिडकीच्या काचा आणि इतर सामान काढून ठेवले होते. यामुळे निर्माण झालेल्या मोकळ्या जागेतून चिमुरडा खेळता खेळता खाली पडला. पण भावेश धावून आला आणि मोठे संकट टळले.

भावेश देवासारखा धावून आला आणि चिमुरड्याच्या जीवावरचे मोठे संकट टळले. चिमुरड्याच्या बाबतीत 'देव तारी त्याला कोण मारी' असाच प्रकार घडल्याची चर्चा परिसरात सुरू झाली.
Comments
Add Comment

Dhule News : शिरपूर-चोपडा मार्गावर भीषण अपघात; दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

Dhule News : धुळे जिल्ह्यातुन एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील शिरपूर-चोपडा मार्गावर झालेल्या भीषण अपघातात

Tiranga Rally : भाजप प्रत्येक जिल्ह्यात काढणार 'तिरंगा रॅली'

- ९ ते १७ ऑगस्टदरम्यान आयोजन; १० ऑगस्टला मुंबईत २५ हजार तरुणांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार मुंबई :

Rickshaw-Taxi Driver : 15 ऑगस्टनंतर 'या' रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाईची शक्यता; मुदतवाढ मिळणार नाही

मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान अनिवार्य करण्याच्या निर्णयाची

Ahilyanagar : शेततळ्यात बुडून दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात हळहळ

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात एक मन हेलावणारी घटना घडली आहे. कोपरगाव तालुक्यातील बाहदराबाद

Pune News : हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक 100 हून अधिक NSG कमांडो, नेमकं काय आहे प्रकरण?

पुणे : पुण्यातील हिंजवडी आयटी (IT Park) पार्कमध्ये बुधवारी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आणि नॅशनल सिक्युरिटी

Agriculture Department : कृषी निविष्ठा घोटाळ्याप्रकरणी १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा दणका; विभागीय चौकशीचे आदेश मुंबई : धाराशिव जिल्ह्यातील कृषी विभागात राष्ट्रीय