Wadkhal-Alibagh Road : वडखळ-अलिबाग रस्त्याच्या कामाची टोलवाटोलवी सुरू

अलिबाग : रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग शहराला जोडणारा एकही रस्ता चांगल्या स्थितीत नाही. अलिबाग-वडखळ या मार्गाचा दहा वर्षापूर्वी चौपदरीकरणाचा प्रस्ताव मांडण्यात आला; परंतु अद्यापही या रस्त्याच्या कामाची जबाबदारी कोणत्या खात्यावर आहे हेच अद्याप प्रशासनाकडून निश्चित झालेले नाही. त्यामुळे हा रस्ता केव्हा पूर्ण होणार असा सवाल जिल्ह्यातील नागरिक व्यक्त करीत आहेत.



रस्त्याच्या कामाबाबत दाद कोण?


मुंबई-गोवा महामार्गाला जोडण्यासाठी वडखळ-अलिबाग हाच एकमेव जवळचा मार्ग आहे. या मार्गावर नेहमी रहद्दारी असल्याने त्याचे चौपदरीकरण करावे, अशी मागणी केली जात आहे.
अलिबागचे माजी आमदार सुभाष (पंडितशेट) पाटील यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांची भेट घेत महामार्गाच्या कामकाजाचा आढावा घेतला. महामार्गाच्या कामात यंत्रणांची टोलवाटोलवी सुरू आहे. महामार्ग प्राधिकरण आणि राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग दोन्ही विभाग या रस्त्याची जबाबबदारी झटकत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामाबाबत दाद कोणाकडे मागायची हा प्रश्न अलिबागकरांना पडला आहे.



रस्त्याची जबाबदारी नक्की कोणाकडे


रस्ता आता राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय झाला.
मात्र हस्तांतरणाची प्रक्रीया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे महामार्ग प्राधिकरण आणि राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग दोघेही या रस्त्यांच्या कामाकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. राजपत्रात नोटीफिकेशन प्रसिध्द झाले की महामार्गाची हस्तांतरण होते. तसे नोटीफिकेशन प्रसिध्द झाले आहे. त्यामुळे अलिबाग- वडखळ जबाबदारी आता राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचीच आहे असे सांगत महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता यशवंत घोटकर आपल्या विभागाची जबाबदारी झटकून टाकतात, तर त्याचवेळेला महामार्ग आमच्या ताब्यात अद्याप आलेला नाही. हस्तांतरणाची प्रक्रीया पूर्ण होत नाही तोवर आम्ही पुढची कारवाई करू शकत नाही, असे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग पेणचे कार्यकारी अभियंता शैलेंद्र गुंड सांगतात. त्यामुळे या रस्त्याची जबाबदारी नक्की कोणाकडे हेच अद्याप प्रशासनाला समजलेले नाही.



शहराच्या वेशीवर मोठमोठे खड्डे


अलिबाग शहराच्या वेशीवर या महामार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. या खड्यांमुळे शहरात येणाऱ्या पर्यटक, वाहन चालकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. खराब रस्त्यामुळे वाहनांचा वेग मंदावत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते आहे. पण तरीही हे खड्डे भरले जात नाहीत. सुट्टीच्या दिवशी या परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे अर्धा तासाचे अंतर पार करण्यासाठी तास ते दीड तास वेळ लागत आहे. रस्त्याच्या दुतर्फा उगवलेली झुडपे काढायची कोणी हा प्रश्नही अनुत्तरीत आहे.

Comments
Add Comment

महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

दिलीप प्रभावळकरांच्या ‘दशावतार’ ची आता मल्याळम भाषेत धडाकेबाज एन्ट्री!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत यंदा एकाच चित्रपटाची सर्वाधिक चर्चा झाली तो म्हणजे ‘दशावतार’! १२ सप्टेंबर २०२५

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीने केली पतीची हत्या! पत्नीचे नगरसेवक होण्याचे स्वप्न, पती संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी...

पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये समाजकार्यात सक्रिय असणारे नकुल भोईर (वय ४०) यांची हत्या करण्यात आली आहे. नकुल भोईर यांची

खासदार नारायण राणे यांचा चिपळूण, देवरूख, रत्नागिरीत जनता दरबार

रत्नागिरी: जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार

दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावर दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.