Wadkhal-Alibagh Road : वडखळ-अलिबाग रस्त्याच्या कामाची टोलवाटोलवी सुरू

अलिबाग : रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग शहराला जोडणारा एकही रस्ता चांगल्या स्थितीत नाही. अलिबाग-वडखळ या मार्गाचा दहा वर्षापूर्वी चौपदरीकरणाचा प्रस्ताव मांडण्यात आला; परंतु अद्यापही या रस्त्याच्या कामाची जबाबदारी कोणत्या खात्यावर आहे हेच अद्याप प्रशासनाकडून निश्चित झालेले नाही. त्यामुळे हा रस्ता केव्हा पूर्ण होणार असा सवाल जिल्ह्यातील नागरिक व्यक्त करीत आहेत.



रस्त्याच्या कामाबाबत दाद कोण?


मुंबई-गोवा महामार्गाला जोडण्यासाठी वडखळ-अलिबाग हाच एकमेव जवळचा मार्ग आहे. या मार्गावर नेहमी रहद्दारी असल्याने त्याचे चौपदरीकरण करावे, अशी मागणी केली जात आहे.
अलिबागचे माजी आमदार सुभाष (पंडितशेट) पाटील यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांची भेट घेत महामार्गाच्या कामकाजाचा आढावा घेतला. महामार्गाच्या कामात यंत्रणांची टोलवाटोलवी सुरू आहे. महामार्ग प्राधिकरण आणि राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग दोन्ही विभाग या रस्त्याची जबाबबदारी झटकत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामाबाबत दाद कोणाकडे मागायची हा प्रश्न अलिबागकरांना पडला आहे.



रस्त्याची जबाबदारी नक्की कोणाकडे


रस्ता आता राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय झाला.
मात्र हस्तांतरणाची प्रक्रीया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे महामार्ग प्राधिकरण आणि राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग दोघेही या रस्त्यांच्या कामाकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. राजपत्रात नोटीफिकेशन प्रसिध्द झाले की महामार्गाची हस्तांतरण होते. तसे नोटीफिकेशन प्रसिध्द झाले आहे. त्यामुळे अलिबाग- वडखळ जबाबदारी आता राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचीच आहे असे सांगत महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता यशवंत घोटकर आपल्या विभागाची जबाबदारी झटकून टाकतात, तर त्याचवेळेला महामार्ग आमच्या ताब्यात अद्याप आलेला नाही. हस्तांतरणाची प्रक्रीया पूर्ण होत नाही तोवर आम्ही पुढची कारवाई करू शकत नाही, असे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग पेणचे कार्यकारी अभियंता शैलेंद्र गुंड सांगतात. त्यामुळे या रस्त्याची जबाबदारी नक्की कोणाकडे हेच अद्याप प्रशासनाला समजलेले नाही.



शहराच्या वेशीवर मोठमोठे खड्डे


अलिबाग शहराच्या वेशीवर या महामार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. या खड्यांमुळे शहरात येणाऱ्या पर्यटक, वाहन चालकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. खराब रस्त्यामुळे वाहनांचा वेग मंदावत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते आहे. पण तरीही हे खड्डे भरले जात नाहीत. सुट्टीच्या दिवशी या परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे अर्धा तासाचे अंतर पार करण्यासाठी तास ते दीड तास वेळ लागत आहे. रस्त्याच्या दुतर्फा उगवलेली झुडपे काढायची कोणी हा प्रश्नही अनुत्तरीत आहे.

Comments
Add Comment

सी-टीईटी देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कामातून सूट

मुंबई : ‘केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा’ (सी-टीईटी) देणाऱ्या शिक्षकांना जिल्हा परिषद व पंचायत समिती

शाहरुख खानच्या ‘किंग’च्या आंतरराष्ट्रीय वितरणासाठी रेड चिलीज एंटरटेनमेंट, मार्फ्लिक्स पिक्चर्स आणि यशराज फिल्म्स यांची ऐतिहासिक भागीदारी

मुंबई : रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि मार्फ्लिक्स पिक्चर्स यांनी शाहरुख खान अभिनीत बहुप्रतिक्षित चित्रपट

'मिर्झापूर: द फिल्म'च्या अखेरच्या शूटिंगनंतर अली फजल भावूक, शेअर केला खास संदेश

मुंबई: बहुप्रतीक्षित 'मिर्झापूर: द फिल्म'चे अखेरचे शूटिंग शेड्यूल पूर्ण झाले असून, भारतातील सर्वात लोकप्रिय

सलमान खानचा 'तेरे नाम' २२ वर्षांनी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित?

Tere Nam Re-release Date : सलमान खानचा 'तेरे नाम' हा चित्रपट परत येत आहे आणि सलमान खानचे चाहते या चित्रपटाचा अनुभव घेण्यासाठी

नवजात बालिकेला कचऱ्याच्या पिशवीत भरलं आणि... खारमधील हृदयपिळवणारा प्रकार

मुंबई : खार पश्चिम येथे नवजात बालिकेला कचऱ्याच्या पिशवीत भरून इमारतीतील रिफ्युजी रूममध्ये फेकून दिल्याचा

‘पेड्डी’चे निर्माते वेंकट सतीश किलारू आणि दिग्दर्शक बुच्ची बाबू सना यांनी राम चरणचे जुळ्या बाळांच्या आनंदवार्तेवर केले अभिनंदन

राम चरणच्या आगामी पेड्डी या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. अशातच त्याच्या वैयक्तिक