भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनाविषयी या बाबी माहिती आहेत का ?


  1. भारत रविवार २६ जानेवारी २०२५ रोजी ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. भारताने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान स्वीकारले. भारताने संविधान स्वीकारले. या संविधानाने ब्रिटिशांच्या 'गव्हर्मेंट ऑफ इंडिया अॅक्ट 1935'ची जागा घेतली. संविधानाची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० पासून सुरू झाल्यामुळे या दिवसापासून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. भारतात २६ जानेवारी १९३० रोजी पूर्ण स्वराज्यासाठी संघर्ष सुरू झाला आणि संविधान स्वीकारल्यामुळे भारतात लोकांची अर्थात प्रजेची सत्ता आली. देश प्रजासत्ताक झाला. देशाला १९२९ मध्ये ब्रिटिशांच्या नेतृत्वात नियंत्रित स्वातंत्र्य मिळाले. लाहोरमध्ये काँग्रेसने १९ डिसेंबर १९२९ रोजी पूर्ण स्वराज्य मागितले. यासाठीचा संघर्ष २६ जानेवारी १९३० पासून सुरू झाला. ब्रिटिश इंडिया २६ जानेवारीला स्वातंत्र्य दिन साजरा करायची आणि १९४७ पासून १५ ऑगस्ट रोजी भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. देशात २६ जानेवारी १९५० पासून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यास सुरुवात झाली.

  2. प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी रोजी साजरा होत असला तरी त्याची त्याची आदल्या वर्षी जुलै महिन्यापासून सुरू होते. प्रत्यक्ष संचलनाच्या दिवशी जे संचलनात सहभागी होणार असतात ते पहाटे तीन वाजल्यापासून कार्यक्रमस्थळी उपस्थित असतात. प्रत्यक्ष संचलनाआधी जवळपास ६०० तासांचा संचलनाचा सराव झालेला असतो. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाची रंगीत तालीम गुरुवार २३ जानेवारी २०२५ रोजी झाली.

  3. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला एक परदेशी पाहुणा आमंत्रित केला जातो. यंदा इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो प्रजासत्ताक दिनाचे शाही पाहुणे आहेत.

  4. प्रजासत्ताक दिनी राष्ट्रगीत सुरू असताना तोफांची सलामी दिली जाते. पहिली तोफ राष्ट्रगीत सुरू होताच सलामी देते. यानंतर ५२ सेकंदांनी तोफेद्वारे दुसरी सलामी दिली जाते.

  5. दरवर्षी प्रजासत्ताक दिनासाठी एक संकल्पना निश्चित केली जाते. या संकल्पनेनुसार कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. सर्व केंद्र आणि राज्य पातळीवरील सरकारी यंत्रणा कार्यक्रमात सहभागी होताना संकल्पनेनुसार नियोजन करतात. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाची संकल्पना 'स्वर्णिम भारत - विरासत और विकास' ही आहे.

  6. प्रजासत्ताक दिनासाठी कर्तव्य पथावरुन विजय चौक ते इंडिया गेट असे संचलन केले जाते. राष्ट्रपती भवन, लाल किल्ला या ऐतिहासिक वास्तूंच्या साक्षीने हे संचलन सुरू असते. लाल किल्ल्यावरुन मान्यवर संचलन बघतात.

  7. पहिला प्रजासत्ताक दिन सोहळा २६ जानेवारी १९५० रोजी नवी दिल्ली येथील आयर्विन स्टेडियम आताचे मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम येथे साजरा झाला. या सोहळ्याच्या निमित्ताने झालेल्या संचलनात तीन हजार जवान सहभागी झाले. हवाई कसरतींमध्ये १०० विमान - हेलिकॉप्टर यांचा ताफा सहभागी झाला होता.

  8. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मुलांच्या राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांची तसेच इतर अनेक सरकारी पुरस्कारांची आणि शौर्य पुरस्कारांची घोषणा केली जाते. यात नागरिकांचा गौरव करणाऱ्या पद्म पुरस्कारांच्या घोषणेचाही समावेश असतो.






Comments
Add Comment

Mumbai-Ahmedabad Bullet Train : प्रतीक्षा संपली! देशातील पहिल्या 'बुलेट ट्रेन'ची पहिली झलक आली समोर; दिल्लीत झळकावले चित्र

नवी दिल्ली : भारतातील बहुचर्चित आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन' (Mumbai-Ahmedabad Bullet Train)

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक

Dubare Elephant Camp : थरकाप उडवणारी घटना! कर्नाटकातील दुबारे हत्ती कॅम्पमध्ये दोन हत्तींच्या झुंजीत महिला पर्यटकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू

कर्नाटकातील कोडागू जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या 'दुबारे एलिफंट कॅम्प' (Dubare Elephant Camp) मध्ये एक अत्यंत

Yogi Adityanath : ‘नमाज पठण करायचे असेल तर शिफ्टमध्ये करा, प्रेमाने ऐकाल तर ठीक, नाहीतर...’; योगी आदित्यनाथ यांचा थेट इशारा

उत्तर प्रदेश : आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh Minister) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath)

India - Sweden Bilateral Talks : पंतप्रधान मोदींची स्वीडनच्या पंतप्रधानांसोबत द्विपक्षीय चर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी स्वीडनमधील गॉथेनबर्ग येथे पंतप्रधान महामहीम उल्फ क्रिस्टरसन

Uttar Pradesh Road Accident : उत्तर प्रदेशामध्ये ट्रक-मॅजिकच्या धडकेत १० जणांचा मृत्यू

लखनौ : येथील लखीमपूर खेरी येथे सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण रस्ते अपघातात १० जणांचा