Amravati : मोबाईल स्नॅचिंग करणारी अल्पवयीनांची टोळी ताब्यात

अमरावती : रात्रीच्या वेळेस रस्त्याने मोबाईलवर बोलत पायी फिरणाऱ्या लोकांच्या मागून भरधाव वेगाने बाईकने येऊन त्यांच्या हातातील मोबाईल फोन जबरीने हिसकावून पळ काढणाऱ्या आठ जणांच्या अल्पवयीनांच्या गॅंगचा राजापेठ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. त्या आठ विधीसंघर्षित बालकांकडून ७१ हजार रुपये किमतीचे सात मोबाईल व गुन्हयात वापरलेल्या २.८० लाख रुपये किमतीची एक बाईक व तीन मोपेड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राजापेठचे ठाणेदार पुनित कुलट यांच्या नेतृत्वातील डीबी स्कॉडने २३ जानेवारी रोजी ही मेगा कारवाई केली.



राजापेठ पोलिस ठाण्यात यंदा नोंद असलेल्या मोबाईल स्नॅचिंगच्या दोन घटनांचा तपास करत असताना महेंद कॉलनी येथील चार, शाम नगर येथील तीन व भातकुली पंचायत समिती परिसरात राहणाऱ्या एका विधी संघर्षग्रस्त बालकांनी राजापेठ व चार, फेजरपुरा पोलिस ठाण्यााच्या हद्दीतून पत्येकी चार व गाडगेनगर हद्दीतून दोन असे दहा मोबाईल फोन जबरीने चोरी केल्याबाबतची माहिती राजापेठ पोलिसांना मिळाली. त्यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले. तुर्तास त्यांच्याकडून सात मोबाईल व दुचाकी जप्त करण्यात आल्या असल्या तरी तपासादरम्यान मोबाईल स्नॅचिंगचे आणखी काही गुन्हे उलगडण्याची शक्यता असल्याची माहिती राजापेठ पोलिसांनी दिली. चैनीसाठी ती अल्पवयीनांची टोळी मोबाईल हिसकावत असल्याची माहितीदेखील समोर आली आहे.

Comments
Add Comment

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी