Chopda : चारचाकीच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू!

जळगाव : चोपडा तालुक्यातील अडावद गावात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. भरधाव येणाऱ्या चारचाकीने दिड वर्षाच्या चिमुकलीस जोरदार धडक दिल्याने तिचा मृत्यु झाला. याप्रकरणी मयताच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. ग्रामपंचायत गल्लीत भरधाव येणाऱ्या महिंद्रा मॅझिमो
(क्रमांक : MH-३९-J-७४२४) या गाडीने दिड वर्षाच्या प्रियांशी संदिप पाटील या चिमुकलीला जोरदार धडक दिली. या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला.



सदर घटना २४ जानेवारी रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. सुवर्णा संदिप पाटील या त्यांच्या घरासमोर असलेल्या दुकानात ताक घेण्यासाठी जात असताना त्यांच्या मागोमाग प्रियांशी रस्ता ओलांडत होती. याचवेळी ग्रामपंचायतीकडून चांग्यानिम चौकाच्या दिशेने भरधाव वेगात आलेल्या चारचाकी गाडीने तिला जोरदार धडक दिली. गाडीच्या पुढील व मागील उजव्या बाजूच्या चाकाखाली प्रियांशी आल्याने ती गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.


दरम्यान, या घटनेनंतर मयत प्रियांशीच्या आईने पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीच्या आधारे आरोपी गाडीचालक पंकज अरुण धनगर (रा. कमळगाव, ता. चोपडा ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार भरत नाईक करत आहेत.

Comments
Add Comment

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पातील गौण खनिजात भ्रष्टाचार

ईटीएस मोजणी अहवाल दोन महिन्यांत सादर करा; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश नागपूर :

महाराष्ट्र नक्षलवाद मुक्त होण्याच्या उंबरठ्यावर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवीन पोलिस चौकी उघडलेल्या ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करा राष्ट्रीय योजना व कृती आराखड्याबाबत राज्यस्तर गठीत

शिवरायांचा इतिहास दुर्लक्षित नाही; सीबीएसई अभ्यासक्रमात बदल घडवण्यासाठी सरकारकडून ठोस पाऊले: राज्यमंत्री पंकज भोईर

अभ्यासक्रमात लवकरच 'Rise of Maratha' हा महत्त्वाचा धडा जोडला जाणार नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांवरील CBSE अभ्यासक्रमातील

महायुतीमुळे आरक्षणाचा पेच सुटला, मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात ओबीसी प्रमाणपत्र वाटप

छत्रपती संभाजीनगर : महायुती सरकारने आरक्षणाचा पेच सोडवला आहे. मराठवाड्यातील मराठ्यांची अनेक वर्षांपासूनची

कोकणासाठी सोनेरी दिवस; महाराष्ट्र सरकार उभारणार वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्ग

मंत्री नितेश राणेंनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार; सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण

Game Changer Decision.... वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाला हिरवा कंदील, कोकणच्या विकासाची दारं उघडणार!'

आंबा, काजू, मत्स्य व्यवसायाला चालना मिळणार; तरुणांना गावातच रोजगार उपलब्ध होईल – मंत्री नितेश राणे नागपूर: