Crime : भंगार गोळा करण्याच्या बहाण्याने महिलांच्या टोळीने केली चोरी!

डोंबिवली : भंगार गोळा करण्याच्या बहाण्याने चार ते पाच महिलांच्या टोळीने रेकी करत चोरी केल्याची घटना शहाडमधील नवरंग सोसायटीत घडली. या टोळीने बंद घरांचे टाळे तोडून मौल्यवान तांब्याच्या भांड्यांसह रोकड केले लंपास केली. चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून कल्याण मधील खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.



शहाड पश्चिम परिसरातील स्टेशनच्या बाजूला लागून असलेल्या नवरंग सोसायटीतील दुसऱ्या मजल्यावर ईश्वर अडांगळे यांच्या घरात चोरीची झाली. आपल्या घरात गेले असता दरवाज्याचे टाळे तोडलेले दिसले. घरात गेल्यावर मौल्यवान तांब्याच्या भांड्यांसह पाच हजारांची रोकड चोरीला गेल्याचे लक्षात आले. सोसायटीतील लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये पहाटे आठ वाजता चार ते पाच महिलांची टोळी इमारतीत शिरताना दिसल्या. त्यांनी घराची रेकी करून टाळे फोडले आणि मौल्यवान वस्तू घेऊन करून पोबारा केला. अडांगळे कुटुंबाने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे महिलांच्या टोळीचा शोध घेतला जात आहे.

Comments
Add Comment

महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

दिलीप प्रभावळकरांच्या ‘दशावतार’ ची आता मल्याळम भाषेत धडाकेबाज एन्ट्री!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत यंदा एकाच चित्रपटाची सर्वाधिक चर्चा झाली तो म्हणजे ‘दशावतार’! १२ सप्टेंबर २०२५

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीने केली पतीची हत्या! पत्नीचे नगरसेवक होण्याचे स्वप्न, पती संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी...

पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये समाजकार्यात सक्रिय असणारे नकुल भोईर (वय ४०) यांची हत्या करण्यात आली आहे. नकुल भोईर यांची

खासदार नारायण राणे यांचा चिपळूण, देवरूख, रत्नागिरीत जनता दरबार

रत्नागिरी: जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार

दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावर दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.