Crime : भंगार गोळा करण्याच्या बहाण्याने महिलांच्या टोळीने केली चोरी!

डोंबिवली : भंगार गोळा करण्याच्या बहाण्याने चार ते पाच महिलांच्या टोळीने रेकी करत चोरी केल्याची घटना शहाडमधील नवरंग सोसायटीत घडली. या टोळीने बंद घरांचे टाळे तोडून मौल्यवान तांब्याच्या भांड्यांसह रोकड केले लंपास केली. चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून कल्याण मधील खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.



शहाड पश्चिम परिसरातील स्टेशनच्या बाजूला लागून असलेल्या नवरंग सोसायटीतील दुसऱ्या मजल्यावर ईश्वर अडांगळे यांच्या घरात चोरीची झाली. आपल्या घरात गेले असता दरवाज्याचे टाळे तोडलेले दिसले. घरात गेल्यावर मौल्यवान तांब्याच्या भांड्यांसह पाच हजारांची रोकड चोरीला गेल्याचे लक्षात आले. सोसायटीतील लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये पहाटे आठ वाजता चार ते पाच महिलांची टोळी इमारतीत शिरताना दिसल्या. त्यांनी घराची रेकी करून टाळे फोडले आणि मौल्यवान वस्तू घेऊन करून पोबारा केला. अडांगळे कुटुंबाने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे महिलांच्या टोळीचा शोध घेतला जात आहे.

Comments
Add Comment

'या' तारखेपासून विंडोज १०चा सपोर्ट होणार बंद

वॉशिंग्टन डीसी :  टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. जगभरात मोठ्या

मुंबईतले आठ हजार बॅनर हटवले

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबईत नवरात्रौत्सवात मोठ्याप्रमाणात शुभेच्छांचे बॅनर आणि फलक लावण्यात आले होते. यामुळे

रिया चक्रवर्तीला दिलासा: मुंबई उच्च न्यायालयाने पासपोर्ट परत करण्याचे दिले आदेश!

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ला अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा पासपोर्ट

झुबीन गर्ग मृत्यू प्रकरण : मॅनेजरनेच दिले विष, समोर आली धक्कादायक माहिती

सिंगापूर : सुप्रसिद्ध गायक झुबीन गर्ग याचा १९ सप्टेंबरला सिंगापूर येथे नॉर्थ इस्ट इंडिया फेस्टिवल दरम्यान बुडून

बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात ३१ ऑक्टोबरपर्यंत भव्य ग्रंथ प्रदर्शन

मुंबई : अभिजात मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने व मॅजेस्टिक ग्रंथ दालनाच्या

महापालिका आयुक्तांनी घेतला मुंबईतील दोन प्रमुख रस्ते प्रकल्प कामांचा आढावा, दिले असे निर्देश

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई किनारी रस्ता (उत्तर) अंतर्गत वेसावे ते भाईंदर प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक