Nutrition Food : विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ! सांगोल्यात पोषण आहारात आढळल्या उंदराच्या लेंड्या

सोलापूर : शालेय पोषण आहारात अळ्या, किडे, झुरळे आणि उंदरांच्या विष्ठा आढळ्याच्या तक्रारी समोर येत आहेत. अशातच आता पुन्हा सोलापूरमध्ये (Solapur News) अशीच घटना घडल्याचे समोर आली आहे. विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारासाठी (Nutrition Food) वापरल्या जाणाऱ्या तांदळात उंदाराच्या लेंड्या आढळल्या आहेत. सातत्याने होणारे असे प्रकार पाहता प्रशासन अद्यापही अ‍ॅक्शन मोडवर आले नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.



सोलापूरमधील सांगोला तालुक्यातील कमलापूर येथे अंगणवाडी आणि प्राथामिक शाळेतील विद्यार्थ्यांना तांदळाबरोबर इतर साहित्य दिले जाते. याच तांदळासह इतर धान्यामध्ये उंदाराच्या लेंड्या आणि आळ्या आढळून आल्या आहेत. शाळेजवळील गोडावूनमध्ये शालेय पोषण आहाराची साठवण करण्यात आली आहे. मात्र त्याचठिकाणी उंदीर आणि घुशींचा वावर असल्यामुळे उंदरांनी मोठ्या प्रमाणात तांदळाची नासाडी केली आहे.


सांगोल्यातील सामाजिक कार्यकर्ते नितीन रणदिवे यांनी रात्री येथील गोडाऊनमधील निकृष्ट धान्याची वस्तुस्थिती समोर आणली. या घटनेनंतर गट शिक्षणाधिकार्यांनी पोषण आहाराचे गोडाऊन सील केले आहे. तसेच संबंधीत ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Chhatrapati Sambhajinagar Murder : तलवारीने सपासप वार अन् ३० सेकंदांत…छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवसाढवळ्या तरुणाचा खून

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहराच्या जुन्या भागातील शहाबाजार परिसरात शुक्रवारी (३१

Maharashtra Rain : मोंथाचा मुक्काम लांबला! तुळशीचं लग्न गाजणार, नोव्हेंबर महिनाही पावसाचा; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना IMD चा थेट इशारा!

नोव्हेंबर महिना (November) उजाडला असला तरी, अद्याप पाऊस जाण्याचं नाव घेत नाहीये. मे महिन्यापासून सुरू झालेला हा पाऊस

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारांच्या अध्यक्षतेखाली ‘उच्चाधिकार समिती’ गठीत

मुंबई : शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरुपी सोडवणूक करण्यासाठी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी

राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय जनगणना २०२५ ला प्रारंभ

मुंबई : भारतातील सागरी मत्स्य व्यवसायाला अधिक बळकटी देण्यासाठी व मच्छीमार समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी

“आजच्या तुलनेत आठ महिन्यांनी होणारी कर्जमाफी अधिक फायद्याची” – बच्चू कडू

नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांकडून तात्काळ कर्जमाफीची मागणी होत असताना, आजच्या तुलनेत 8 महिन्यांनी जाहीर होणारी

कार्तिकीसाठी राज्यातील विविध मार्गावरून ५५० एसटी बसेस धावणार

सोलापूर : सावळ्या विठ्ठलाचे भक्त असलेल्या वारकऱ्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून सोलापूरसह सांगली, सातारा,