बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि एका खंडणी प्रकरणाचा संबंध आहे, असा आरोप तपास पथकाने केला. यानंतर न्यायालयाने आरोपी वाल्मिक कराडला सात दिवसांची एसआयटी कोठडी ठोठावली. या कोठडीचा कालावधी संपला म्हणून वाल्मिकला २२ जानेवारी रोजी न्यायालयात हजर केल्यावर मकोका अंतर्गत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. ही कोठडी मिळाल्यावर जामिनाचा अर्ज करणाऱ्या वाल्मिकने आता अर्ज मागे घेतला आहे.
न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर काही तासांतच वाल्मिक कराडची तब्येत बिघडली. तब्येत बिघडल्यामुळे वाल्मिकला बीड जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर वाल्मिकने जामीन अर्ज मागे घेतला. मकोका अंतर्गत तपास पथक अनेकदा आरोपींना किमान १८० दिवस जामीन मिळत नाही. न्यायालयीन कोठडी मकोका अंतर्गत देण्यात आल्यामुळे आता जामीन मिळणे कठीण आहे याची जाणीव वाल्मिकला झाली. यानंतर त्याची तब्येत बिघडली. रुग्णालयात दाखल झाल्यावर वाल्मिकने जामीन अर्ज मागे घेतला. कायद्यातील तरतुदीनुसार संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरण यात आवश्यकता भासल्यास न्यायालयाच्या परवानगीने तपास पथक आरोपी वाल्मिक कराडची चौकशी करू शकेल.
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…