Weather Update : थंडी पळाली, उकाडा वाढणार; हवामान विभागाचा अंदाज!

Share

मुंबई : राज्यातील हवामानात (Weather Update) सध्या चढ-उतार होत आहे. राज्यातील विविध भागांमध्ये तापमानात लक्षणीय बदल होत असून, याचा परिणाम विविध जिल्ह्यांवर होताना दिसत आहे. राज्यातील बहुतांश भागांमध्ये दुपारच्या वेळी तापमानात वाढ होत असतानाच दुसरीकडे रात्री आणि पहाटेच्या वेळी मात्र गारठा वाढत असल्याने राज्यातून अद्यापही थंडीने काढता पाय घेतलेला नाही हे दिसून येत आहे.

सातत्यानं सक्रिय असणाऱ्या पश्चिमी वाऱ्यांमुळे राज्यात पुन्हा एकदा थंडी काहीशी सक्रिय होताना दिसत आहे. असं असलं तरीही तापमानातील चढ- उतार मात्र कायम असल्याचं पाहायला मिळतंय. पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रामध्येही धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. तर, विदर्भात काही अंशी पहाटेच्या वेळी बोचरी थंडी जाणवत असून उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात शुक्रवारनंतर (२४ जानेवारी) तापमानवाढीस सुरुवात होणार आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा उष्मा वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई शहर, उपनगर, औरंगाबाद, पुणे इथं किमान तापमान १४ ते १७ अंशांदरम्यान असलं तरीही कमाल तापमानाचा आकडा सरासरी ३४ अंशांदरम्यान असल्याचं म्हटलं जात आहे.

हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात वाढ होत असली तरीही पुढील २४ तासांमध्ये त्यात आणखी घट अपेक्षित असल्याचा इशारा देण्यात आला आहे. कोकण , मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पुढील २४ तासांमध्ये आकाश निरभ्र राहणार असून, किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट अपेक्षित आहे. असं असलं तरीही २४ तासांचं चक्र ओलांडल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा हवामानात बदलांचा इशारा देण्यात आला आहे.

पंजाब आणि नजीकच्या भागांमध्ये चक्राकार वारे सक्रिय असल्यामुळे राजस्थानासह मध्य भारतापर्यंत याचे परिणाम दिसून येत आहेत. वायव्य भारतातून १५० नॉट्स इतक्या वेगानं वाऱ्याचे जोरदार झोत वाहत असल्यामुळे राज्यातील तापमानात यामुळं चढ- उतार पाहायला मिळत आहेत.उत्तराखंड, जम्मू काश्मीर, काश्मीरचं खोरं, हिमाचल प्रदेश, येथील पर्वतीय भागांमध्ये तापमानात लक्षणीय घट कायम राहणार असून, बर्फवृष्टीमुळं मैदानी भागांमध्ये थंडीचा मारा कायम असेल. (Weather Update)

Recent Posts

पंतप्रधान मोदी २२-२३ एप्रिलला सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…

27 minutes ago

बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर

ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…

58 minutes ago

अनधिकृत इमारतींची संख्या ही ११० ने वाढली

पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…

2 hours ago

जलवाहिनी फुटल्याने २४ तास ‘पाणीबाणीचे’ मुंबईकरांसमोर संकट

काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…

2 hours ago

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…

3 hours ago

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

5 hours ago