Weather Update : थंडी पळाली, उकाडा वाढणार; हवामान विभागाचा अंदाज!

मुंबई : राज्यातील हवामानात (Weather Update) सध्या चढ-उतार होत आहे. राज्यातील विविध भागांमध्ये तापमानात लक्षणीय बदल होत असून, याचा परिणाम विविध जिल्ह्यांवर होताना दिसत आहे. राज्यातील बहुतांश भागांमध्ये दुपारच्या वेळी तापमानात वाढ होत असतानाच दुसरीकडे रात्री आणि पहाटेच्या वेळी मात्र गारठा वाढत असल्याने राज्यातून अद्यापही थंडीने काढता पाय घेतलेला नाही हे दिसून येत आहे.



सातत्यानं सक्रिय असणाऱ्या पश्चिमी वाऱ्यांमुळे राज्यात पुन्हा एकदा थंडी काहीशी सक्रिय होताना दिसत आहे. असं असलं तरीही तापमानातील चढ- उतार मात्र कायम असल्याचं पाहायला मिळतंय. पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रामध्येही धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. तर, विदर्भात काही अंशी पहाटेच्या वेळी बोचरी थंडी जाणवत असून उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात शुक्रवारनंतर (२४ जानेवारी) तापमानवाढीस सुरुवात होणार आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा उष्मा वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई शहर, उपनगर, औरंगाबाद, पुणे इथं किमान तापमान १४ ते १७ अंशांदरम्यान असलं तरीही कमाल तापमानाचा आकडा सरासरी ३४ अंशांदरम्यान असल्याचं म्हटलं जात आहे.


हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात वाढ होत असली तरीही पुढील २४ तासांमध्ये त्यात आणखी घट अपेक्षित असल्याचा इशारा देण्यात आला आहे. कोकण , मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पुढील २४ तासांमध्ये आकाश निरभ्र राहणार असून, किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट अपेक्षित आहे. असं असलं तरीही २४ तासांचं चक्र ओलांडल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा हवामानात बदलांचा इशारा देण्यात आला आहे.


पंजाब आणि नजीकच्या भागांमध्ये चक्राकार वारे सक्रिय असल्यामुळे राजस्थानासह मध्य भारतापर्यंत याचे परिणाम दिसून येत आहेत. वायव्य भारतातून १५० नॉट्स इतक्या वेगानं वाऱ्याचे जोरदार झोत वाहत असल्यामुळे राज्यातील तापमानात यामुळं चढ- उतार पाहायला मिळत आहेत.उत्तराखंड, जम्मू काश्मीर, काश्मीरचं खोरं, हिमाचल प्रदेश, येथील पर्वतीय भागांमध्ये तापमानात लक्षणीय घट कायम राहणार असून, बर्फवृष्टीमुळं मैदानी भागांमध्ये थंडीचा मारा कायम असेल. (Weather Update)

Comments
Add Comment

बायोकॉन हेल्थकेअर कंपनीकडून ४१५० कोटीची QIP निधी उभारणी

मोहित सोमण: बायोकॉन या जागतिक दर्जाच्या हेल्थकेअर कंपनीने ४१५० रूपयांची गुंतवणूक इक्विटी क्यूआयपी (Qualified Institutional

Big Boss Marathi : कठीण परिस्थितीची आठवण आजही मनात; करण सोनावणे म्हणतो, ‘त्या अनुभवांनी मला घडवलं’

मुंबई : बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून, घरातील

BMC Election Results : २२७ वॉर्डांचे निकाल एकाच वेळी नाहीत, टप्प्याटप्प्याने मतमोजणी

मुंबई : राज्यभरात महापालिका निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले असून, मुंबई महापालिकेच्या (BMC) निकालांकडे संपूर्ण

मराठी भाषेबाबतचा भाजपाचा दृष्टीकोन व्यापक -प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

विरोधकांची मराठी भाषेबाबतची भूमिका नकारात्मक मुंबई :  भाजपाचे मराठी म्हणजे मराठी व्याकरणातल्या अनेकवचन

आर्मर सिक्युरिटी इंडिया आयपीओला पहिल्या दिवशी थंड प्रतिसाद! दुपारपर्यंत केवळ ०.०३ पटीने मिळाले सबस्क्रिप्शन

मोहित सोमण: आजपासून आर्मर सिक्युरिटी इंडिया लिमिटेड (Armour Security India Limited) कंपनीचा आयपीओ (IPO) बाजारात गुंतवणूकदारांसाठी

वर्षभरात १ लाख व्हिसा रद्द; नियम मोडणाऱ्यांना दणका

८ हजार भारतीय विद्यार्थ्यांवरही टांगती तलवार नवी दिल्ली : अमेरिकेला अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि बेकायदेशीर