प्रहार    

Nitesh Rane : मुंब्राचे जीतुद्दीन आणि बारामतीच्या ताईंना फक्त खान कलाकारांची काळजी!

  135

Nitesh Rane : मुंब्राचे जीतुद्दीन आणि बारामतीच्या ताईंना फक्त खान कलाकारांची काळजी!

सैफवरील हल्ल्यावर मंत्री नितेश राणे यांचे वक्त्व्य


मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) मागच्या आठवड्यात चाकू हल्ला झाला. त्यामध्ये सैफ गंभीररित्या जखमी झाला होता. वांद्रयाच्या लिलावती रुग्णालयात त्याच्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. दोन दिवसांपूर्वी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. सैफचा फिटनेस पाहून अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले असताना या हल्ल्याबाबत संशय व्यक्त होत आहे. अशातच मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी देखील याबाबत वक्तव्य केलं आहे.



'जेव्हा कोणत्याही खानला दुखापत होते तेव्हा सर्वजण त्याबद्दल बोलू लागतात. मात्र सुशांत सिंग राजपूत सारख्या हिंदू अभिनेत्यावर अत्याचार होतात तेव्हा कोणीही काहीही बोलण्यासाठी पुढे येत नाही'. मुंब्राचे जीतुद्दीन (जितेंद्र आव्हाड) आणि बारामतीची ताई (सुप्रिया सुळे) यांना कधी हिंदू कलाकाराची काळजी करताना पाहिले नाही. मात्र कोणत्याही खानला सुखापत झाली तर त्यांना काळजी वाटते, असा घणाघात मंत्री नितेश राणे यांनी केला.


त्याचबरोबर सैफला बघितल्यावर त्याला खरच चाकू मारला की अॅक्टिंग करतोय असा संशय येत आहे. “बांग्लादेशी सैफ अली खानच्या घरात घुसले. नालायकपणा किती आहे. आधी फक्त नाक्यावर उभे रहायचे. आता घरात घुसायला लागले आहेत. कदाचित त्याला घेऊन जायला आले असतील. सैफ बाहेरुन असा चालत होता की, मलाच संशय आला याला खरच कोणी चाकू मारला की हा अॅक्टिंग करुन बाहेर पडला. असं टुणटुण करुन” असा टोला देखील नितेश राणे यांनी लगावला.

Comments
Add Comment

कांदा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नाशिक जिल्ह्यातील ९६७२ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना १८ कोटी ५८ लाख रुपयांचे अनुदान वितरीत

येवला: राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला लासलगाव

तुळजाभवानी मंदिरात तणाव: आव्हाड समर्थकांनी सुरक्षा रक्षकांशी धक्काबुक्की केल्याचा आरोप

तुळजापूर: तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामावरून सुरू असलेल्या वादामुळे तुळजापूरमध्ये राजकीय

ठाण्यात यंदा टेंभीनाक्यावर अनुभवयाला मिळणार थरांचा थरार

ठाणे :  धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यात टेंभीनाका येथे दहिहंडी उत्सव सुरु करुन साहसी उत्सवाला एका उंचीवर नेऊन

मुंबई-दिघी आणि मुंबई-काशीद रो-रो सेवा मार्चपर्यंत कार्यान्वित करा- मंत्री नितेश राणे

डिझेल परतावा योजनेपासून एकही पात्र मच्छीमार वंचित राहणार नाही मुंबई : मुंबईकरांचा कोकणात जाण्याचा प्रवास सुखकर

Laxman Hake on Manoj Jarange Patil: गणेशोत्सवात मुंबईला जाऊन दंगल घडवायचा जरांगेंचा प्लॅन! लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप

पुणे: मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील येत्या २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मराठा मोर्चा घेऊन धडकणार

'ब्राह्मण पाताळयंत्री', जाधव यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वाद पेटणार?

भास्कर जाधवांचा ब्राह्मण सहाय्यक संघाविरोधात आक्रमक पवित्रा मुंबई: ठाकरे गटाचे नेते आणि गुहागरचे आमदार भास्कर