Nitesh Rane : मुंब्राचे जीतुद्दीन आणि बारामतीच्या ताईंना फक्त खान कलाकारांची काळजी!

सैफवरील हल्ल्यावर मंत्री नितेश राणे यांचे वक्त्व्य


मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) मागच्या आठवड्यात चाकू हल्ला झाला. त्यामध्ये सैफ गंभीररित्या जखमी झाला होता. वांद्रयाच्या लिलावती रुग्णालयात त्याच्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. दोन दिवसांपूर्वी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. सैफचा फिटनेस पाहून अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले असताना या हल्ल्याबाबत संशय व्यक्त होत आहे. अशातच मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी देखील याबाबत वक्तव्य केलं आहे.



'जेव्हा कोणत्याही खानला दुखापत होते तेव्हा सर्वजण त्याबद्दल बोलू लागतात. मात्र सुशांत सिंग राजपूत सारख्या हिंदू अभिनेत्यावर अत्याचार होतात तेव्हा कोणीही काहीही बोलण्यासाठी पुढे येत नाही'. मुंब्राचे जीतुद्दीन (जितेंद्र आव्हाड) आणि बारामतीची ताई (सुप्रिया सुळे) यांना कधी हिंदू कलाकाराची काळजी करताना पाहिले नाही. मात्र कोणत्याही खानला सुखापत झाली तर त्यांना काळजी वाटते, असा घणाघात मंत्री नितेश राणे यांनी केला.


त्याचबरोबर सैफला बघितल्यावर त्याला खरच चाकू मारला की अॅक्टिंग करतोय असा संशय येत आहे. “बांग्लादेशी सैफ अली खानच्या घरात घुसले. नालायकपणा किती आहे. आधी फक्त नाक्यावर उभे रहायचे. आता घरात घुसायला लागले आहेत. कदाचित त्याला घेऊन जायला आले असतील. सैफ बाहेरुन असा चालत होता की, मलाच संशय आला याला खरच कोणी चाकू मारला की हा अॅक्टिंग करुन बाहेर पडला. असं टुणटुण करुन” असा टोला देखील नितेश राणे यांनी लगावला.

Comments
Add Comment

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

पाणी समजून प्यायलं थिनर; चार वर्षांच्या चिमुकल्याच्या तोंडापासून ते पोटापर्यंत...

ठाणे : ठाण्याच्या इंदिरानगरमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. चार वर्षाच्या चिमुकल्याने चुकून पाणी समजून

मराठमोळ्या मुलीशी लग्न करुन आता पत्नीला बुरख्यातच ठेवतो; म्हणाल्या, पुरुष स्त्रियांकडे...

मुंबई: प्रसिद्ध युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अदनान शेख सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत