Nitesh Rane : मुंब्राचे जीतुद्दीन आणि बारामतीच्या ताईंना फक्त खान कलाकारांची काळजी!

सैफवरील हल्ल्यावर मंत्री नितेश राणे यांचे वक्त्व्य


मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) मागच्या आठवड्यात चाकू हल्ला झाला. त्यामध्ये सैफ गंभीररित्या जखमी झाला होता. वांद्रयाच्या लिलावती रुग्णालयात त्याच्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. दोन दिवसांपूर्वी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. सैफचा फिटनेस पाहून अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले असताना या हल्ल्याबाबत संशय व्यक्त होत आहे. अशातच मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी देखील याबाबत वक्तव्य केलं आहे.



'जेव्हा कोणत्याही खानला दुखापत होते तेव्हा सर्वजण त्याबद्दल बोलू लागतात. मात्र सुशांत सिंग राजपूत सारख्या हिंदू अभिनेत्यावर अत्याचार होतात तेव्हा कोणीही काहीही बोलण्यासाठी पुढे येत नाही'. मुंब्राचे जीतुद्दीन (जितेंद्र आव्हाड) आणि बारामतीची ताई (सुप्रिया सुळे) यांना कधी हिंदू कलाकाराची काळजी करताना पाहिले नाही. मात्र कोणत्याही खानला सुखापत झाली तर त्यांना काळजी वाटते, असा घणाघात मंत्री नितेश राणे यांनी केला.


त्याचबरोबर सैफला बघितल्यावर त्याला खरच चाकू मारला की अॅक्टिंग करतोय असा संशय येत आहे. “बांग्लादेशी सैफ अली खानच्या घरात घुसले. नालायकपणा किती आहे. आधी फक्त नाक्यावर उभे रहायचे. आता घरात घुसायला लागले आहेत. कदाचित त्याला घेऊन जायला आले असतील. सैफ बाहेरुन असा चालत होता की, मलाच संशय आला याला खरच कोणी चाकू मारला की हा अॅक्टिंग करुन बाहेर पडला. असं टुणटुण करुन” असा टोला देखील नितेश राणे यांनी लगावला.

Comments
Add Comment

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय