दारुच्या नशेत बापानेच केली मुलाची हत्या

नाशिक : दारूच्या नशेत बाप लेकाच्या झालेल्या भांडणात बापाने स्वतःच्या मुलाला जीवे ठार मारले. उपनगर पोलीस ठाण्यात गेल्या चौथ्या दिवशी दुसऱ्या खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी सांगितले की, अनिल विठ्ठल गुंजाळ (वय 20) राहणार आम्रपाली झोपडपट्टी, उपनगर कॅनल रोड,असे बापाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे.


विठ्ठल गुंजाळ व त्यांचा मुलगा अनिल गुंजाळ यांचे रोज नशेमध्ये भांडण होत असत.गेल्या महिन्याभरात दहा ते पंधरा वेळा एकमेकाची हाणामारी होत होती. काल रात्री बाप लेक प्रचंड नशेत असताना त्यांच्यात वाद झाले. बापाने मुलगा अनिल याच्या डोक्यावर जड वस्तूने मारल्याने तो बेशुद्ध झाला. त्यास नागरिकांच्या मदतीने बिटको रुग्णालयात व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र आज सकाळी तो मयत झाला असल्याचे उपनगर पोलिसांनी सांगितले. हल्लेखोर बाप विठ्ठल गुंजाळ याला तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम दुपारपर्यंत सुरू होते.

अधिकचा तपास पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे करीत आहे. गंधर्व नगरी या ठिकाणी रविवारी संध्याकाळी एका आठ वर्षीय मतिमंद मुलावर अतिप्रसंग करून त्याचा खून केल्याची घटना घडली होती. पोलिसांच्या याबाबतचा तपास सुरू असतानाच दुसऱ्या खुनाचा गुन्हा घडला.

Comments
Add Comment

शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात काय म्हणाले मंत्री दादाजी भुसे?

मुंबई : शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शालेय शिक्षण विभाग सकारात्मक असून त्यांच्या

शेतकरी, पशुपालकांना वीज दरात सवलत मिळणार, पण 'या' अटींवर...

मुंबई : राज्य शासनाने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता वीजदरात

Tamhini Ghat Accident : 'सनरूफ' ठरला जीवघेणा! ताम्हिणी घाटात दरड कोसळून थरार, सनरुफ तोडून दगड थेट कारमध्ये पडले; महिलेचा जागीच मृत्यू!

पुणे/रायगड : पुणे-मानगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) एक अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी अपघाताची घटना

Bacchu Kadu Farmers Andolan : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बच्चू कडू आज मुंबईत; संध्याकाळी ७ वाजता थेट मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा!

७ वाजता महाबैठक! मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार मुंबई : शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून

Weather Updates : समुद्र खवळणार, प्रशासनाची मोठी खबरदारी! हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा मोठा निर्णय

अरबी समुद्र (Arabian Sea) आणि पश्चिम बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) झालेल्या हवामान बदलांमुळे (Weather Changes) महाराष्ट्राच्या

प्रतीक्षा संपली! नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नेरळ-माथेरान मिनी ट्रेन धावणार!

नेरळ : मध्य रेल्वे प्रशासनाने नेरळ-माथेरान दरम्यानची बहुप्रतिक्षित मिनी ट्रेन सेव