Bollywood Death Threats : बॉलिवूडवर संकटाचे सावट! चार दिग्गज कलाकारांना दिली जीवे मारण्याची धमकी

मुंबई : काही महिन्यांपासून अभिनेता सलमान खानला (Salman Khan) सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यानंतर नुकतेच सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे. अशातच आता बॉलीवूडमधले चार दिग्गज कलाकारांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे बॉलिवूड चित्रपटसृष्टीवर संकट आल्याचे दिसून येत आहे.



कॉमेडियन कपिल शर्माला (Kapil Sharma), अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav), कोरिओग्राफर रेमो डिसुझा (Remo Dsouza) आणि सुगंधा मिश्रा यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. कपिलसह त्याच्या कुटुंबालाही मारण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



धमकीचा पाकिस्तानशी कनेक्शन


कपिल शर्मा, राजपाल यादव, रेमो डिसूझा आणि सुंगधा मिश्रा या कलाकारांना ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हा ई-मेल पाकिस्तानमधून पाठवण्यात आला असल्याचा अंदाज दिला जात आहे. यामध्ये 'BISHNU' असे लिहिण्यात आले आहे. तसेच ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीला जर ८ तासात प्रतिसाद मिळाला नाही तर, कारवाई करणार असे लिहले आहे. (Bollywood Death Threats)

Comments
Add Comment

पीओकेमध्ये मोठी दुर्घटना, पाकिस्तानचे लष्करी हेलिकॉप्टर कोसळले; 21 सैनिकांचा मृत्यू

Pakistan Army Helicopter Crash : पाकव्याप्त काश्मीरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकव्याप्त मुझफ्फराबादमध्ये पाकिस्तानच्या

Mantri Ashish Shelar : दशावतार लोककलेला राजाश्रय मिळणार

सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही; मंडळांच्या मागण्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुख्य

Sanjay Shirsat : मॅरेथॉन बैठकीत ऐतिहासिक निर्णय; उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘महाबोधी संकुल’

MUMBAI : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत असलेल्या वादावर अखेर तोडगा

Chandrashekhar Bawankule : सिंधी विस्थापितांना दिलासा, ‘विशेष अभय योजने’ला मुदतवाढ

MUMBAI : राज्यातील सिंधी विस्थापितांच्या निवासी आणि व्यावसायिक मालमत्तांचे फ्री-होल्ड (मुक्तहस्त) करण्यासाठी

Gold Silver Rate : सोने चांदीच्या दरात मोठी घसरण , ग्राहकांना दिलासा; जळगावच्या सराफ बाजारात आजचे दर किती ?

Gold Silver Rate : गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात चढउतार पहायला मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला

Ashish Shelar : रत्नागिरी-सिंधुदुर्गातील मोबाईल कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी सात दिवसांत अहवाल तयार करा

मंत्री आशिष शेलार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश मुंबई : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोबाईल