स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील सुनावणी पुढे ढकलली

नवी दिल्ली: राज्यामध्ये गेल्या चार वर्षांपासून २६ महानगरपालिका, २५७ महापालिका, २६ जिल्हा परिषद आणि २८९ पंचायत समित्यांमधील निवडणुका प्रलंबित आहे. याबाबत २१ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहेत. राज्यातील जनताही याबाबतच्या निर्णयाबद्दल उत्सुक होती. मात्र ही सुनावणी मंगळवारी झाली नाही. आता ही सुनावणी २८ जानेवारीला होण्याची शक्यता आहे.


तारीख पुढे ढकल्याने साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. न्यायालयात प्रभार रचना, लोकसंख्येतील १० टक्के वाढ धरून निश्चित करण्यात आलेली सदस्य संख्या तसेच ओबीसी आरक्षण यावरून तब्बल ५७ याचिका दाखल आहेत. या याचिकांवर २१ जानेवारीला सुनावणी होणार होती. मात्र ही झालीच नाही. गेल्या चार वर्षांपासून या निवडणुकी रखडलेल्या आहेत. त्यावर सुनावणी होईल अशी अपेक्षा होती. मात्र आता ही सुनावणी पुढे ढकलली आहे.


अनेक कारणांनी या निवडणुका लवकरात लवकर घेणे गरजेचे आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना मुंबई वगळून इतर महानगरपालिकांसाठी त्रिसदस्यी प्रभागरचना केली होती. त्यानंतर आरक्षण सोडतही काढण्यात आली. यानंतर शिंदे सरकार आले आणि त्यांनी पुन्हा चार सदस्यी प्रभाग रचना केली. त्यामुळे आता पुन्हा प्रभाग रचना करावी लागेल तसेच त्यावर हरकती-सूचनांची प्रक्रिया होणे आणि अंतिम प्रभाग रचना होणे यासाठी कमीत कमी ९० दिवस लागू शकतात. यामुळे या निवडणुकांबाबतचा निकाल सर्वोच्च न्यायालयात न लागल्यास त्या ऑक्टोबरमध्ये घ्याव्या लागतील.

Comments
Add Comment

आता बोला? एकाच घरात ४,२७१ मतदार!

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात त्रिस्तरीय पंचायत निवडणुकीच्या मतदार यादीत मोठी अनियमितता समोर

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या