राज ठाकरे तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर

नाशिक : आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारपासून तीन दिवस नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असून, त्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.


विधानसभा निवडणुकीत मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली असली, तरी आगामी मनपा निवडणुकीत मनसेला टाळी दिली जाईल, अशी चर्चा आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील विधानसभेला झालेला पराभव विसरून कामला लागा, अशा सूचना दिल्या आहेत. मुंबईनंतर मनसेसाठी नाशिक महत्त्वाची महापालिका आहे.


मनसेने पहिल्यांदाच राज्यात सत्ता नाशिक मनपात बघितली मात्र त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला उतरती कळा लागली आणि अंतर्गत गटबाजीने डोके वर काढले आहे. ते पाहता राज ठाकरे यांचा दौरा पक्षासाठी महत्त्वाचा आहे. पक्षाच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहे. तसेच महापालिका निवडणुकीच्या संदर्भात कार्यकर्त्यांना सूचनादेखील करणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना गेल्या वर्षी मार्चमध्ये पक्षाचा वर्धापन दिन व अधिवेशन नाशिकला घेतले होते. परंतु लोकसभा निवडणुका न लढवण्याच्या निर्णयामुळे पक्षात नाराजी पाहायला मिळाली होती.

Comments
Add Comment

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

एक्सप्रेवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी अन् २५ किलोमीटर पर्यंत रांगा; नेमकं पुण्यात घडलं काय ?

लोणावळा : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातामुळे संपूर्ण मार्गावर

Congress: काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर, नगरसेवक थेट दिल्लीत पोहोचले, बैठकीत नेमकं घडलं काय?

दिल्ली: चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमध्ये गटातील राजकारणामुळे सत्ता गमावण्याची वेळ