Konkan Railway : चाकरमान्यांसाठी Goodnews! आता माणगाव रेल्वे स्थानकावरही थांबणार जलद गाड्या

माणगाव : कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना रेल्वे प्रवासादरम्यान माणगाव (Mangaon) रेल्वे स्थानकात थांबा नसल्याने अनेक गैरसोयींचा, अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र आता या अडचणींना पुर्णविराम मिळाला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी मुंबई येथील अतिथी सभागृहात मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांच्या सभेत माणगाव रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या जलद रेल्वे गाड्यांना थांबे देण्याचे आश्वासन दिले आहे.



माणगांव रेल्वे स्थानक हे रायगड जिल्हयातील एक महत्त्वाचे कोकण रेल्वेचे मध्यवर्ती स्थानक आहे. या रेल्वे स्थानकाचा लाभ माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, तळा या तालुक्यातील रेल्वे प्रवाशांना अधिक लाभ होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कोकण रेल्वे प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्याचा मोठा अर्थिक वाटा असल्याने कोकणातील रेल्वे स्थानकात जास्तीत जास्त रेल्वे गाड्यांना थांबे द्यावेत, तेथील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, प्रवाशांसाठी उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध कराव्यात असे आदेश खासदार सुनील तटकरे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिले. याबाबत तातडीने कार्यवाही झाली नाही तर रेल्वे मंत्री अश्विनी वैश्णव यांची भेट घेऊन या समस्या मांडून या मागण्या मान्य करून घेईन असे आश्वासन खासदार सुनील तटकरे यांनी दिले.


दरम्यान, माणगाव रेल्वे स्थानकावर फलाट क्र. २ वरुन प्रवाशांना स्थानकाच्या बाहेर येण्यासाठी फलाट क्र.१ वर येण्यासाठी उंच जिन्याचा उपयोग करावा लागतो. त्यामुळे वयस्कर महिला प्रवाशांना सामान घेऊन येण्यास फारच त्रास होतो तरी फलाट क्र. २ हा पुर्वेकडे नाणोरे रस्त्याकडे उघडण्यात आला तर प्रवाशांना फार उपयोगी होईल तरी फ्लॉट क्र.२ नाणोरे रस्त्याकडे उघडण्यात यावा, असे आदेशही त्यांनी दिले आहेत.

Comments
Add Comment

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी

ग्रामीण भागातील घरबांधणी आता होणार सुलभ; बांधकाम परवानगीचे अधिकार तालुका स्तरावर देण्याचे संकेत!

- मंत्री उदय सामंत यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या घराच्या

Jalna: गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडले अन् ११० सिलिंडर चोरले, जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जालना: जालना तालुक्यातील रामनगर परिसरात गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये चक्क गॅस सिलिंडरची मोठी चोरी झाल्याचा

Weather Update: महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना अलर्ट, ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार

मुंबई: महाराष्ट्रावर ऐन उन्हाळ्यात अस्मानी संकट घोंघावत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला उष्णतेच्या लाटेने

लालपरीचा कायापालट, २२ हजार बसेस पूर्णपणे बदलणार; मंत्री सरनाईकांची माहिती

मुंबई : ग्रामीण महाराष्ट्राची लाईफलाईन मानली जाणारी लालपरी आता मोठ्या बदलाच्या दिशेने वाटचाल करत आहे. राज्य

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, गॅस बुकींगनंतर ९६ तासांत सिलेंडर घरपोच होणार; जिल्हाधिकाऱ्यांचे एजन्सींना आदेश

पुणे: मराठी नववर्षारंभ म्हणजेच गुढी पाडव्याचा सण अवघ्या दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपला असताना गॅस टंचाईमुळे