Konkan Railway : चाकरमान्यांसाठी Goodnews! आता माणगाव रेल्वे स्थानकावरही थांबणार जलद गाड्या

  137

माणगाव : कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना रेल्वे प्रवासादरम्यान माणगाव (Mangaon) रेल्वे स्थानकात थांबा नसल्याने अनेक गैरसोयींचा, अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र आता या अडचणींना पुर्णविराम मिळाला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी मुंबई येथील अतिथी सभागृहात मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांच्या सभेत माणगाव रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या जलद रेल्वे गाड्यांना थांबे देण्याचे आश्वासन दिले आहे.



माणगांव रेल्वे स्थानक हे रायगड जिल्हयातील एक महत्त्वाचे कोकण रेल्वेचे मध्यवर्ती स्थानक आहे. या रेल्वे स्थानकाचा लाभ माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, तळा या तालुक्यातील रेल्वे प्रवाशांना अधिक लाभ होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कोकण रेल्वे प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्याचा मोठा अर्थिक वाटा असल्याने कोकणातील रेल्वे स्थानकात जास्तीत जास्त रेल्वे गाड्यांना थांबे द्यावेत, तेथील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, प्रवाशांसाठी उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध कराव्यात असे आदेश खासदार सुनील तटकरे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिले. याबाबत तातडीने कार्यवाही झाली नाही तर रेल्वे मंत्री अश्विनी वैश्णव यांची भेट घेऊन या समस्या मांडून या मागण्या मान्य करून घेईन असे आश्वासन खासदार सुनील तटकरे यांनी दिले.


दरम्यान, माणगाव रेल्वे स्थानकावर फलाट क्र. २ वरुन प्रवाशांना स्थानकाच्या बाहेर येण्यासाठी फलाट क्र.१ वर येण्यासाठी उंच जिन्याचा उपयोग करावा लागतो. त्यामुळे वयस्कर महिला प्रवाशांना सामान घेऊन येण्यास फारच त्रास होतो तरी फलाट क्र. २ हा पुर्वेकडे नाणोरे रस्त्याकडे उघडण्यात आला तर प्रवाशांना फार उपयोगी होईल तरी फ्लॉट क्र.२ नाणोरे रस्त्याकडे उघडण्यात यावा, असे आदेशही त्यांनी दिले आहेत.

Comments
Add Comment

Pune Airport: प्रवाशांना घेऊन विमान पुण्यात तर आलं, पण सामान मागेच राहीलं!

स्पाइसजेटच्या दुबई-पुणे विमानाने इंधन भारामुळे प्रवाशांचे सामान न घेताच पुण्यात लँडिंग केले.  पुणे:  दुबईहून

जिओमध्ये गुंतवणूक ही माझ्या आयुष्यातली मोठी रिस्क : मुकेश अंबानी

रिलायन्स आता डीप-टेक, अ‍ॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बनण्याच्या मार्गावर मुंबई  : टेलिकॉम क्षेत्रातील

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करावे, परराष्ट्र मंत्र्यांकडे आ. निलेश राणे यांची मागणी

मालवण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करावे. अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी

Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच

Madhuri Misal : नागरिकांना मिळणार दिलासा ! मिळकतकरासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेने राज्यसरकारकडे पाठवावा...

पुणे :  मिळकत करावर दंड आणि व्याज लावला जात असल्याने राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी नागरिकांसाठी मोठा निर्णय

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावर प्रवाशांना भरवा लागणार युजर शुल्क

नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळ कधी सुरु होणार या प्रतिक्षेत गेल्या अनेक महिन्यांपासून नवी मुंबईकर आहेत. परंतू