Bhandup Update : ट्रायडेंट पाठोपाठ भांडुपच्या मॉलमध्ये आढळला महिलेचा मृतदेह!

मुंबई : मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलची बातमी ताजी असतानाच भांडुप मधील बंद असलेल्या मॉलच्या नजीकच्या भागात महिलेचा मृतदेह आढळला आहे. या घटनेने भांडुप परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या महिलेबद्दल अधिक माहिती मिळवत असून तिच्या नातेवाइकांबद्दलही तपास करत आहेत.


मुंबईच्या उपनगरातील भांडुप स्टेशनच्या नजीक बंद असलेल्या ड्रीम मॉलच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात आज सकाळी ९:४० च्या सुमारास एका अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला आहे. हा ड्रीम मॉल कित्येक वर्षांपासून बंद आहे. मुसळधार पाऊस पडल्यावर या भागात पाणी साचत असल्याने बऱ्याच व्यापारांनी या मॉल मधून काढता पाय घेतला. तसेच या मॉल मध्ये मध्यंतरी आग लागल्याने हॉस्पिटलमधील पेशंट इतरत्र हलवण्यात आले होते.



तेव्हापासून या मॉलचा दर्जा खालावला होता. त्यानंतर आज या मॉल मध्ये बेवारस मृतदेह आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत महिला ३० वर्षांची असल्याचा अंदाज पोलिसांनी दर्शवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार महिलेच्या अंगावर गुलाबी ड्रेस आणि पांढरी ओढणी असल्याचे समजले आहे. दरम्यान ही महिला कोण, ती इथे कशी आली, तिचा मृत्यू कशामुळे झाला, ही आत्महत्या आहे कि खूण अशा अनेक प्रश्नांचा छडा पोलीस लावत आहेत.

Comments
Add Comment

कबुतरांना दाणे घालणं पडलं महागात! बसला हजारोंचा दणका

मुंबई: कबुतरांमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याला धोका असल्याने कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय मुंबई

New Year News Rules : नवं वर्ष, नवे नियम! १ जानेवारीपासून तुमचे आर्थिक गणित बदलणार; २०२६ मध्ये लागू होणारे 'हे' १० मोठे बदल!

मुंबई : वर्ष २०२५ ला निरोप देण्यासाठी आता अवघे ४ दिवस उरले असून, १ जानेवारी २०२६ पासून आपल्या दैनंदिन जीवनातील

कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने शासकीय सदनिकांचे वाटप

मुंबई : राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुंबईतील शासकीय निवासस्थान वाटपावरून येणाऱ्या तक्रारींची

पश्चिम रेल्वेवर शनिवारी ३०० फेऱ्या रद्द

मध्य रेल्वेचा उद्या मेगा ब्लॉक जलद आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांचे हाल मुंबई : मुंबईकरांचे दैनंदिन आयुष्य

पद्म पुरस्कार, भारतरत्न उपाधी नव्हे; ते नावाआधी लावता येणार नाही

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हे नागरी

राज्यात जनसुरक्षा कायदा लागू

अध्यादेश जारी; कडव्या डाव्या संघटनांवर होणार कारवाई मुंबई : बहुचर्चित जनसुरक्षा कायदा अखेर राज्यात लागू झाला