Dr. Kisan Maharaj Sakhre Death : ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांचे निधन

  104

पुणे : वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. किसन महाराज साखरे यांचे सोमवारी रात्री पुण्यातील चिंचवड येथे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. प्रकृती खालावल्यानंतर त्यांना दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.


डॉ. साखरे यांच्या पश्चात कन्या यमुना कंकाळ आणि पुत्र यशोधन साखरे व चिदंबरेश्वर साखरे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आळंदी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. साखरे यांनी क्षेत्र आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त म्हणून काम पाहिले. तसेच आळंदी आणि देहू परिसर विकास समितीच्या सुकाणू समितीचे अध्यक्षपदही भूषवले. त्यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाची दृकश्राव्य प्रत प्रकाशित केली आणि संत साहित्याच्या प्रसारासाठी मोठे योगदान दिले.



त्यांच्या साहित्यप्रवासात त्यांनी संस्कृत व मराठीतून ११५ ग्रंथ लिहिले. यामध्ये सार्थ ज्ञानेश्वरी, सार्थ एकनाथी भागवत, सार्थ तुकाराम महाराज गाथा, सार्थ भगवद्गीता, सार्थ ब्रह्मसूत्र, सार्थ उपनिषद आणि सोहम योग यांसारख्या ग्रंथांचा समावेश आहे. त्यांनी एकूण ५०० ताम्रपटांवर ज्ञानेश्वरी प्रकाशित केली. २०१८ मध्ये महाराष्ट्र सरकारने त्यांना 'ज्ञानोबा-तुकाराम' पुरस्कार प्रदान केला होता, तर टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने त्यांना डी. लिट पदवीने सन्मानित केले होते.


डॉ. साखरे यांच्या निधनाने वारकरी संप्रदायाची मोठी हानी झाली असून ही पोकळी कधीच भरून निघणार नाही, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या