Jyotiba Temple : जोतिबाच्या दारी भाविकांच्या जीवाशी खेळ! प्रसादाच्या कुंद्यामध्ये ब्लेड आढळल्याने खळबळ

  77

कोल्हापूर : कोल्हापूरमधील दख्खनचा राजा जोतिबाच्या (Jyotiba Temple) चैत्र यात्रेत दोन टन खराब पेढे खवा सापडला होता. त्यामुळे सर्व परिसरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकारानंतर अन्न व औषध प्रशासनाने यात्रा काळात काही दुकानदारांवर कारवाई केली होती. मात्र आता पुन्हा जोतिबाच्या दारी भाविकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. जोतिबाच्या डोंगरावर असणाऱ्या मिठाईच्या दुकानात प्रसादाच्या कुंद्यामध्ये ब्लेड आढळल्याचे समोर आले आहे.



जोतिबाच्या डोंगरावर मेवा मिठाईच्या दुकानात खव्याच्या बर्फीत ब्लेडचा अर्धा तुकडा आढळला आहे. याप्रकारामुळे मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भाविकांकडून या प्रकरणी संताप व्यक्त होत असताना संबंधीतांवर जिल्हा प्रशासनाने फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे यांनी पत्रकार परिषदेत केली.


जोतिबा डोंगरावर येणाऱ्या पेढे, खवा बर्फी या पदार्थांवर कोणतीही एक्सपार तारीख व उत्पादन तारीख दिसत नाही. मोठ-मोठी भांडी भरून हा खवा पंढरपूर-सोलापूर, तसेच परराज्यातून डोंगरावर येतो. त्यामुळे पूर्ण भांडे संपेपर्यंत महिना दीड महिना ही मेवा मिठाई विकली जाते. ही मिठाई खाल्यामुळे भाविकांच्या आरोग्यास धोका आहे. त्यामुळे वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे नवाळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक