Jyotiba Temple : जोतिबाच्या दारी भाविकांच्या जीवाशी खेळ! प्रसादाच्या कुंद्यामध्ये ब्लेड आढळल्याने खळबळ

  70

कोल्हापूर : कोल्हापूरमधील दख्खनचा राजा जोतिबाच्या (Jyotiba Temple) चैत्र यात्रेत दोन टन खराब पेढे खवा सापडला होता. त्यामुळे सर्व परिसरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकारानंतर अन्न व औषध प्रशासनाने यात्रा काळात काही दुकानदारांवर कारवाई केली होती. मात्र आता पुन्हा जोतिबाच्या दारी भाविकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. जोतिबाच्या डोंगरावर असणाऱ्या मिठाईच्या दुकानात प्रसादाच्या कुंद्यामध्ये ब्लेड आढळल्याचे समोर आले आहे.



जोतिबाच्या डोंगरावर मेवा मिठाईच्या दुकानात खव्याच्या बर्फीत ब्लेडचा अर्धा तुकडा आढळला आहे. याप्रकारामुळे मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भाविकांकडून या प्रकरणी संताप व्यक्त होत असताना संबंधीतांवर जिल्हा प्रशासनाने फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे यांनी पत्रकार परिषदेत केली.


जोतिबा डोंगरावर येणाऱ्या पेढे, खवा बर्फी या पदार्थांवर कोणतीही एक्सपार तारीख व उत्पादन तारीख दिसत नाही. मोठ-मोठी भांडी भरून हा खवा पंढरपूर-सोलापूर, तसेच परराज्यातून डोंगरावर येतो. त्यामुळे पूर्ण भांडे संपेपर्यंत महिना दीड महिना ही मेवा मिठाई विकली जाते. ही मिठाई खाल्यामुळे भाविकांच्या आरोग्यास धोका आहे. त्यामुळे वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे नवाळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Comments
Add Comment

अशोक नगरमधील पालिकेच्या मैदानाला तलावाचे स्वरूप

नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही पालिकेचे दुर्लक्ष कांदिवली : कांदिवली पूर्वेला अशोक नगरमधील एकमेव असलेल्या

पुण्यात भिडे पूल दीड महिना बंद

पुणे : सदाशिवपेठेतून डेक्कन मेट्रो स्थानकात जाण्यासाठी महामेट्रोकडून भिडे पुलावरून लोखंडी पादचारी पूल

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची

आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकलसह शालेय साहित्याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली