Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव छापण्यास भारताचा नकार

मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाने पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता. यानंतर रोहित शर्मा देखील कर्णधार म्हणून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नाही. पाकिस्तान या आयसीसी स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे पण भारताचे सामने दुबईत होणार आहेत. त्यांनतर आता पुन्हा एकदा बीसीसीआयने मोठं पाऊल उचललं आहे.साधारणपणे सर्व संघांच्या जर्सीवर या स्पर्धेचे यजमान देशाचे नाव असते, मात्र भारताच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव नसणार आहे. असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.


चॅम्पियन्स ट्रॉफीचा उद्घाटन सोहळा आणि कॅप्टन्स डे १६ किंवा १७ फेब्रुवारीला होणार आहे. बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कर्णधार रोहित शर्माला पाकिस्तानमध्ये पाठवण्यासही नकार दिला होता. यावर पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने बीसीसीआयवर क्रिकेटमध्ये राजकारण आणल्याचा आरोप केला आहे.अशातचं आता भारतीय संघाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव छापलं जाणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. पाकिस्तानकडे यंदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद असल्याने इतर देशांच्या खेळाडूंच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव असणार आहे. पीसीबीने याप्रकरणी भारत आणि बीसीसीआयवर आरोप केले आहेत.



पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) एका अधिकाऱ्याने सांगितले की, "बीसीसीआय क्रिकेटमध्ये राजकारण आणत आहे जे खेळासाठी चांगले नाही. बीसीसीआयने आपला संघ पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिला. त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या उद्घाटन समारंभाला त्यांचा कर्णधारला (रोहित शर्मा) पाकिस्तानला पाठवले नाही आणि आता पाकिस्तानचे नाव जर्सीवर (भारतीय क्रिकेट संघ) छापले जाणार नसल्याच्या बातम्या येत आहेत. आम्ही आयसीसीकडून आशा करतो की ते असे होऊ देणार नाहीत आणि पाकिस्तानला पाठिंबा देतील."भारताने २०२३ मध्ये एकदिवसीय विश्वचषकाचे आयोजन केले होते. त्यानंतर पाकिस्तानी संघ भारतात आला आणि आपले सर्व सामने येथे खेळले. पाकिस्तानच्या जर्सीवर भारताचे नाव होते. याआधीही जेव्हा भारताने आयसीसी स्पर्धांचे आयोजन केले होते तेव्हा पाकिस्तानच्या जर्सीवर भारत असे लिहिले होते. मात्र, बीसीसीआयला आपल्या खेळाडूंच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव नको आहे. आता या मुद्द्यावर पाकिस्तानने आयसीसीकडे धाव घेतली आहे.

Comments
Add Comment

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे

IND vs PAK : पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज

मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटमधील संघर्ष हा जगातील सर

भारताची बॉक्सर जॅस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पटकावले सुवर्णपदक, रचला इतिहास

नवी दिल्ली: भारताची प्रतिभावान बॉक्सर जैस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२५

BCCI च्या कुटुंबातील कोणीही मेलं नाही, म्हणून..., शुभम द्विवेदीच्या पत्नीची प्रतिक्रिया

"सामान्य लोक माझं ऐकतील आणि सामन्यावर बहिष्कार टाकतील" ऐशन्या द्विवेदी Asia Cup 2025 India Vs Pak Match Controversy: पहलगाम हल्ल्यात