Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव छापण्यास भारताचा नकार

  83

मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाने पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता. यानंतर रोहित शर्मा देखील कर्णधार म्हणून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नाही. पाकिस्तान या आयसीसी स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे पण भारताचे सामने दुबईत होणार आहेत. त्यांनतर आता पुन्हा एकदा बीसीसीआयने मोठं पाऊल उचललं आहे.साधारणपणे सर्व संघांच्या जर्सीवर या स्पर्धेचे यजमान देशाचे नाव असते, मात्र भारताच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव नसणार आहे. असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.


चॅम्पियन्स ट्रॉफीचा उद्घाटन सोहळा आणि कॅप्टन्स डे १६ किंवा १७ फेब्रुवारीला होणार आहे. बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कर्णधार रोहित शर्माला पाकिस्तानमध्ये पाठवण्यासही नकार दिला होता. यावर पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने बीसीसीआयवर क्रिकेटमध्ये राजकारण आणल्याचा आरोप केला आहे.अशातचं आता भारतीय संघाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव छापलं जाणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. पाकिस्तानकडे यंदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद असल्याने इतर देशांच्या खेळाडूंच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव असणार आहे. पीसीबीने याप्रकरणी भारत आणि बीसीसीआयवर आरोप केले आहेत.



पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) एका अधिकाऱ्याने सांगितले की, "बीसीसीआय क्रिकेटमध्ये राजकारण आणत आहे जे खेळासाठी चांगले नाही. बीसीसीआयने आपला संघ पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिला. त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या उद्घाटन समारंभाला त्यांचा कर्णधारला (रोहित शर्मा) पाकिस्तानला पाठवले नाही आणि आता पाकिस्तानचे नाव जर्सीवर (भारतीय क्रिकेट संघ) छापले जाणार नसल्याच्या बातम्या येत आहेत. आम्ही आयसीसीकडून आशा करतो की ते असे होऊ देणार नाहीत आणि पाकिस्तानला पाठिंबा देतील."भारताने २०२३ मध्ये एकदिवसीय विश्वचषकाचे आयोजन केले होते. त्यानंतर पाकिस्तानी संघ भारतात आला आणि आपले सर्व सामने येथे खेळले. पाकिस्तानच्या जर्सीवर भारताचे नाव होते. याआधीही जेव्हा भारताने आयसीसी स्पर्धांचे आयोजन केले होते तेव्हा पाकिस्तानच्या जर्सीवर भारत असे लिहिले होते. मात्र, बीसीसीआयला आपल्या खेळाडूंच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव नको आहे. आता या मुद्द्यावर पाकिस्तानने आयसीसीकडे धाव घेतली आहे.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र