Captain: ऋषभ पंतनंतर अजिंक्य रहाणेकडे या संघाचे नेतृत्व

मुंबई: अजिंक्य रहाणेला कर्णधारपद मिळाले आहे. आयपीएल २०२५ च्या सुरूवातीआधी रहाणेला मुंबईच्या रणजी संघाच्या कर्णधारपदी नियुक्त करण्यात आले आहे. रहाणेच्या नेतृत्वात १७ सदस्यीय संघात रोहित शर्माचीही निवड करण्यात आली आहे. मुंबईला रणजी ट्रॉफीमध्ये जम्मू अँड काश्मीरशी पुढील सामना खेळायचा आहे.


आजच विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतला लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. आता रहाणे रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, यशस्वी जायसवाल आणि शार्दूल ठाकूर असताना रहाणेकडे नेतृत्व देण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रहाणेला कोलकाता नाईट राडयडर्सचे नेतृत्वही मिळू शकते.



१० वर्षांनी रणजी खेळणार रोहित, १७ वर्षांनी होणार हे


आता हे निश्चित झाले आहे की रोहित शर्मा १० वर्षांनी रणजी ट्रॉफीमध्ये खेळणार आहे. रोहितलाही १७ सदस्यी संघात निवडण्यात आले आहे. रोहित मैदानावर उतरताच इतिहास रचला जाईल. खरंतर, १७ वर्षांनी एखादा भारतीय कर्णधार रणजी ट्रॉफीमध्ये खेळणार आहे. याआधी असे सौरव गांगुलीने केले होते. तेव्हा दादा कर्णधार असताना रणजी सामने खेळला होता.



रणजी ट्रॉफीच्या पुढील फेरीसाठी मुंबईचा संघ


अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा, यशस्वी जायसवाल, आयुष म्हात्रे, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, शिवम दुबे, हार्दिक तमोरे (विकेटकीपर), आकाश आनंद (विकेटकीपर), तनुष कोटियन, शम्स मुलानी, हिमांशु सिंह, शार्दुल ठाकुर, मोहित अवस्थी, सिल्वेस्टर डिसूजा, रॉयस्टन डायस और कर्ष कोठारी.



ऋषभ पंत बनला लखनऊचा कर्णधार


ऋषभ पंत आयपीएल २०२५मध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार असेल. गेल्या हंगामापर्यंत केएल राहुल लखनऊचा कर्णधार होता. मात्र त्याने आयपीएल २०२५च्या लिलावाआधी रिलीज केले होते. लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएल २०२५च्या मेगा लिलावात ऋषभ पंतसाठी ऐतिहासिक बोली लावली होती. लखनऊने या विस्फोटक फलंदाजाला २७ कोटी रूपयांना खरेदी केले होते.

Comments
Add Comment

राष्ट्रीय खोखोपटू सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेत प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती

मुंबई : राष्ट्रीय खोखोपटू तथा क्रीडा प्रसारक श्री. सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना

WPL 2026 Final: बंगळूरची विजयी घोडदौड दिल्ली थांबवू शकणार का?

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. रॉयल चॅलेंजर्स

IND vs PAK : "आयसीसीचे मुख्यालय भारतात असते तर बॉम्बने उडवले असते..."; पाकिस्तानी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान

रविवारी (१ फेब्रुवारी) पाकिस्तान सरकारने जाहीर केले की त्यांचा संघ २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी मैदानात उतरेल,

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निवडणुकीची स्थगिती कायम, रोहित पवारांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली  : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांना सर्वोच्च न्यायालयाने जोरदार

IND vs PAK : पाकिस्तान नेहमीप्रमाणे "यू-टर्न" घेईल; सुनील गावस्कर यांची पाकिस्तानवर टीका

मुंबई: टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तान सरकारने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.

जोकोविचला नमवत कार्लोसची ऑस्ट्रेलियन ओपनला गवसणी

मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपन २०२६च्या पुरुष एकेरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या युवा खेळाडू कार्लोस