IND vs PAK : "आयसीसीचे मुख्यालय भारतात असते तर बॉम्बने उडवले असते..."; पाकिस्तानी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान

रविवारी (१ फेब्रुवारी) पाकिस्तान सरकारने जाहीर केले की त्यांचा संघ २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी मैदानात उतरेल, परंतु १५ फेब्रुवारी रोजी श्रीलंकेत होणारा भारताविरुद्धचा सामना खेळणार नाही. तेव्हापासून हा मुद्दा चर्चेत आहे. अशातच आता पाकिस्तानी युट्यूबर आणि अभिनेता अरसलान नसीर याने एक वादग्रस्त विधान केले आहे. यात त्याने म्हटले आहे की 'जर आयसीसीचे कार्यालय भारतात असते तर ते बॉम्बने उडवले असते." पाकिस्तानी युट्यूबरने आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांच्याविरुद्धही विष ओकले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे.



त्याच्या आजूबाजूच्या परिसरात बॉम्बस्फोट केले असते: 


सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये, अर्सलान जय शहा यांना उद्देशून म्हणाला, "तुमच्या मर्यादेत राहा. हे २५ लोकांसाठी तुमचे छोटेसे कार्यालय आहे. तिथे बसा आणि YouTube आणि Netflix पाहण्याचा आनंद घ्या. आयसीसीचे कार्यालय दुबईत आहे, त्यामुळे ते सुरक्षित आहे. जर हे कार्यालय भारतात असते तर आमच्या लोकांनी त्या मुख्यालयावर आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात बॉम्बस्फोट केले असते."


टी-२० विश्वचषक शनिवार, ७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या स्पर्धेचा पहिला सामना पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यात खेळला जाईल. विशेष म्हणजे पाकिस्तानने स्पर्धा सुरू होण्याच्या फक्त ०६ दिवस आधी भारताविरुद्ध सामना खेळण्यास नकार दिला आहे. पाकिस्तानने केवळ टीम इंडियाविरुद्ध खेळण्यास नकार दिला नाही तर बांगलादेशनेही यापूर्वी स्पर्धेतून माघार घेतली होती. बांगलादेशने त्यांचे लीग सामने भारताव्यतिरिक्त इतर देशात हलवण्याची विनंती केली होती. तथापि, आयसीसीने बांगलादेशची विनंती फेटाळून लावली आहे.





आयसीसीचा पाकिस्तानला थेट इशारा:


पीसीबीने स्पष्ट केलं की, पाकिस्तान संघ टी-२० वर्ल्ड कपमध्ये सहभागी होईल, मात्र १५ फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध होणारा सामना खेळणार नाही. या निर्णयामुळे संपूर्ण स्पर्धेच्या नियोजनावर पाणी फेरलं असून, आयसीसीने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आयसीसीने पीसीबीला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील,असा थेट इशाराही दिला आहे.


भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांना पाकिस्तान "यू-टर्न" घेईल असे वाटते. मात्र तरीही पाकिस्तानने १५ फेब्रुवारी रोजी भारताविरुद्धच्या टी-२० विश्वचषक सामन्यावर बहिष्कार टाकला तर आयसीसीने त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करावी असे आवाहन देखील गावस्कर यांनी केले आहे.

Comments
Add Comment

Krunal Pandya : हार्दिकच्या लग्नाला कृणाल पांड्या गैरहजर राहणार ? चर्चांमागचं नेमकं कारण काय ?

IPL 2026 : हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. आयपीएल २०२६ संपण्याआधीच हार्दिक पांड्या मॉडेल आणि इन्फ्लुएंसर

Hardik Pandya : आयपीएल संपण्याआधीच हार्दिक पांड्या पुन्हा लग्न करणार ? सोशल मीडियावर चर्चांना उधाण , सत्य काय?

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आयपीएल २०२६ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली

RCB VS PBKS : सलग पाच पराभवाने पंजाबसमोर डू ऑर डाय स्थिती ! धर्मशाळेत पंजाब-आरसीबी आमने सामने

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये आज १७ मे रोजी पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अशी निर्णायक लढत होणार आहे. हा

Pakistan in WTC : षटकारांच्या संथ गतीचा फटका, ICC च्या कारवाईमुळे पाकिस्तान WTC मध्ये आठव्या स्थानी

मुंबई  : आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट संघावर कडक कारवाई करत मोठा दंड ठोठावला आहे. याचा संघाला वर्ल्ड टेस्ट

RR : राजस्थान रॉयल्सला पहिल्या पराभवाचा बदला घेण्याची संधी

आयपीएल रणसंग्राम - सुशील परब इंडियन प्रीमियर लीग २०२६ मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील

IPL 2026 : प्लेऑफसाठी विजय महत्त्वाचा!

आयपीएल रणसंग्राम - सुशील परब आययपीएल २०२६ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि पंजाब किंग्स यांच्यातील ६१ वा सामना