IND vs PAK : "आयसीसीचे मुख्यालय भारतात असते तर बॉम्बने उडवले असते..."; पाकिस्तानी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान

रविवारी (१ फेब्रुवारी) पाकिस्तान सरकारने जाहीर केले की त्यांचा संघ २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी मैदानात उतरेल, परंतु १५ फेब्रुवारी रोजी श्रीलंकेत होणारा भारताविरुद्धचा सामना खेळणार नाही. तेव्हापासून हा मुद्दा चर्चेत आहे. अशातच आता पाकिस्तानी युट्यूबर आणि अभिनेता अरसलान नसीर याने एक वादग्रस्त विधान केले आहे. यात त्याने म्हटले आहे की 'जर आयसीसीचे कार्यालय भारतात असते तर ते बॉम्बने उडवले असते." पाकिस्तानी युट्यूबरने आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांच्याविरुद्धही विष ओकले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे.



त्याच्या आजूबाजूच्या परिसरात बॉम्बस्फोट केले असते: 


सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये, अर्सलान जय शहा यांना उद्देशून म्हणाला, "तुमच्या मर्यादेत राहा. हे २५ लोकांसाठी तुमचे छोटेसे कार्यालय आहे. तिथे बसा आणि YouTube आणि Netflix पाहण्याचा आनंद घ्या. आयसीसीचे कार्यालय दुबईत आहे, त्यामुळे ते सुरक्षित आहे. जर हे कार्यालय भारतात असते तर आमच्या लोकांनी त्या मुख्यालयावर आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात बॉम्बस्फोट केले असते."


टी-२० विश्वचषक शनिवार, ७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या स्पर्धेचा पहिला सामना पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यात खेळला जाईल. विशेष म्हणजे पाकिस्तानने स्पर्धा सुरू होण्याच्या फक्त ०६ दिवस आधी भारताविरुद्ध सामना खेळण्यास नकार दिला आहे. पाकिस्तानने केवळ टीम इंडियाविरुद्ध खेळण्यास नकार दिला नाही तर बांगलादेशनेही यापूर्वी स्पर्धेतून माघार घेतली होती. बांगलादेशने त्यांचे लीग सामने भारताव्यतिरिक्त इतर देशात हलवण्याची विनंती केली होती. तथापि, आयसीसीने बांगलादेशची विनंती फेटाळून लावली आहे.





आयसीसीचा पाकिस्तानला थेट इशारा:


पीसीबीने स्पष्ट केलं की, पाकिस्तान संघ टी-२० वर्ल्ड कपमध्ये सहभागी होईल, मात्र १५ फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध होणारा सामना खेळणार नाही. या निर्णयामुळे संपूर्ण स्पर्धेच्या नियोजनावर पाणी फेरलं असून, आयसीसीने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आयसीसीने पीसीबीला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील,असा थेट इशाराही दिला आहे.


भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांना पाकिस्तान "यू-टर्न" घेईल असे वाटते. मात्र तरीही पाकिस्तानने १५ फेब्रुवारी रोजी भारताविरुद्धच्या टी-२० विश्वचषक सामन्यावर बहिष्कार टाकला तर आयसीसीने त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करावी असे आवाहन देखील गावस्कर यांनी केले आहे.

Comments
Add Comment

Football fever in Kolhapur : क्रिकेटच्या देशात फुटबॉलचा थरार; अर्जेंटिनाच्या विजयाने कोल्हापूर झाले 'फुटबॉलमय'!

Kolhapur : भारत हा तसा क्रिकेटवेडा देश, पण कोल्हापूरची गोष्टच न्यारी आहे! 'सॉकर सिटी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या

FIFA WORLDCUP 2026 : अर्जेंटिनाच्या टीकाकारांना मेस्सीचे चोख उत्तर: 'आम्हाला काहीही आयते मिळालेले नाही'

लिओनेल मेस्सीने अर्जेंटिनाच्या विश्वचषक प्रवासावर टीका करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. "आम्हाला काहीही फुकट

Major Cricket League : एका सामन्यात ३ शतकं, ५१ सिक्स अन् ५३७ रन; क्रिकेटच्या इतिहासात लिहिला गेला नवा अध्याय

मुंबई : टी-२० क्रिकेटच्या इतिहासात असा सामना पाहायला मिळाला, ज्याने या फॉरमॅटमधील (Format) जवळपास सगळे मोठे विक्रम (Records)

ICC : वर्ल्ड कपमध्ये आयसीसीचा ‘मास्टर प्लॅन’? भारत-पाक सामन्यांसाठी मोठा बदल

मुंबई : क्रिकेट विश्वातील सर्वात चर्चेचा विषय ठरलेला भारत-पाकिस्तान सामना पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.

Rohit Sharma Retirement News : रोहित शर्माच्या निवृत्तीची चर्चा; इंग्लंडविरुद्धचा सामना ठरणार शेवटचा?

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज (Batsman) रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या वनडे (ODI)

IND vs ENG : कार्डिफमध्ये इंग्लंडची बाजी; भारताला पराभूत करत मालिकेत साधली बरोबरी

कार्डिफ : जो रूट (Joe Root) याच्या नाबाद ९९ धावांच्या (Runs) शानदार खेळीच्या जोरावर इंग्लंडने भारताचा दुसऱ्या एकदिवसीय (ODI)