Free Travel : जाणून घ्या कोणाला मिळणार तेजस, वंदे भारतसह हमसफरचा मोफत प्रवास?

मुंबई : केंद्र सरकारने (Central Government) एलटीसीअंतर्गत (LTC) सरकारी कर्मचाऱ्यांना वंदे भारत एक्स्प्रेस, हमसफर आणि तेजस सारख्या लक्झरी ट्रेनमध्ये मोफत प्रवास करण्याची सुविधा देण्यात आली आहे.


सरकारी कर्मचाऱ्यांना आता ३८५ गाड्यांमध्ये प्रवास करण्याचा पर्याय आहे. ज्यात १३६ वंदे भारत एक्स्प्रेस, ९७ हमसफर व ८ तेजस एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे. यापूर्वी, ते राजधानी, शताब्दी व दुरांतोसारख्या १४४ हाय-एंड ट्रेनमध्ये एसी प्रवासाचा आनंद घेऊ शकत होते. या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना (Government Employees) देशातील सर्व भागांत एलटीसी प्रवास बुकिंगसाठी अधिक पर्याय उपलब्ध होतील. कार्मिक व प्रशिक्षण विभागाला एलटीसीअंतर्गत वेगवेगळ्या प्रीमियम ट्रेन्सबाबत सर्व कार्यालये व कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनांनंतर हा निर्णय घेण्यात आला.



सर्व स्तरावरील सरकारी कर्मचारी अत्याधुनिक वंदे भारत, तेजस आणि हमसफर एक्स्प्रेसमध्ये जागतिक स्तरावरील प्रवासाच्या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. या निर्णयानुसार आता कर्मचारी २४१ अतिरिक्त गाड्यांसाठी एलटीसी वापरू शकतात. या निर्णयामुळे, देशातील सर्व प्रदेशांमध्ये एकूण ३८५ गाड्या असतील जिथे त्या धावत आहेत. ज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना एलटीसी प्रवासासाठी तिकिटे बुक करता येतील.


सरकारी कर्मचाऱ्यांच्या पात्रतेनुसार, एलटीसी अंतर्गत तेजस एक्स्प्रेस, वंदे भारत एक्स्प्रेस आणि हमसफर एक्स्प्रेसमध्ये प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल. एलटीसीचा लाभ घेणाऱ्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना प्रवासासाठी तिकिटांवर झालेला खर्चही परत मिळतो. केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना जम्मू व काश्मीर, लडाख, अंदमान व निकोबार बेटे आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये प्रवास करण्यासाठी रजा प्रवास सवलत मिळण्यासाठी योजना दोन वर्षांसाठी वाढवली होती.
आता ही योजना २६ सप्टेंबर २०२४ ते २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत लागू असेल. या योजनेंतर्गत सरकारी कर्मचारी या निवडक ठिकाणी प्रवास करण्यासाठी त्यांच्या होम टाऊन एलटीसीची देवाण-घेवाण करू शकतात. वंदे भारत, तेजस व शताब्दी एक्स्प्रेस या तीन गाड्यांमधील ११ व त्याखालील स्तरावरील कर्मचारी छोट्या व मध्यम अंतराच्या रेल्वे प्रवासात चेअर कारचाही वापर ते करू शकतात.

Comments
Add Comment

Maharashtra Heavy Rain : राज्यात पावसाचा कहर! १७ NDRF आणि 6 SDRF पथके तैनात; लोणावळ्यात तब्बल ६७० मिमी पावसाची नोंद

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीस ८ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात

इंद्रायणीच्या पुरामुळे आळंदीत वारकऱ्यांची गैरसोय; मुंबई डबेवाले करणार भोजन व निवासाची व्यवस्था

Mumbai  : खेड, मावळ, पिंपरी-चिंचवड आणि लोणावळा परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे

Heavy Rain in Mumbai Pune : पावसाचा कहर! मुंबई-ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट तर पुण्यात १२ जुलैपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी उद्या

Flood in Indrayani : इंद्रायणीला पूर; वारकऱ्यांसाठी सरकारचे महत्त्वाचे आवाहन! आळंदीत न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त आळंदीकडे निघालेल्या वारकरी आणि भाविकांसाठी राज्य

TET Exam Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! चारही आरोपींना १८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

भिवंडी : राज्यभरात गाजत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात मोठी घडामोड झाली