Bangladeshi : पाच बांगलादेशी महिला बार्शी पोलिसांच्या ताब्यात

  76

सोलापूर : बनावट आधारकार्ड तयार करून अवैधरीत्या भारतात प्रवेश करून बार्शीतील पंकजनगर येथे राहत असलेल्या पाच बांगलादेशी (Bangladeshi) महिलांना बार्शी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत महिला पोलीस निरीक्षक सोनप जगताप यांनी पंकजनगर परिसरात बांगलादेशी नागरिकाकडून घुसखोरी व बनावट दस्तऐवज याच्या वापरासंदर्भात शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. ही कार्यवाही दहशतविरोधी पथक सोलापूर युनिट व बार्शी पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली.



चौकशीत त्यांच्याकडे कोणताही वैध पासपोर्ट किंवा व्हिसा नसल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये रोख रक्कम १ लाख ४१ हजार रुपये रोख, ४६ हजारांचे मोबाइल, बनावट आधारकार्ड, बांगलादेशी कागदपत्रे मतदान कार्ड हे जप्त करण्यात आले. याप्रकरणी नजमा यासिन शेख (३३), रेहना बेगम समद शिकदर (३३), आरजिना खातून अनवर शेख (१६), शिखा शकीब बुहिया २३, शकीब बादशाह बुहिया (२३), शोएब सलाम शेख (२४) बांगलादेशीय पाच महिलांना ताब्यात घेतले आहे. तर, याच्या चौकशीत येथील पंकजनगर येथे वास्तव्य करण्यास मदत करणारे बार्शी येथील विशाल मांगडे, राणी पूर्ण नाव माहीत नाही व किरण परांजपे या सर्वांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत