Santosh Deshmukh Murder Case : आंबेजोगाई रोडवरील टोलनाका कि अपहरण केंद्र ??

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी मुख्य आरोपी कोण आणि त्याला शिक्षा कधी होणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. या घटनेप्रकरणात पोलिसांचा तपास अजूनही सुरु आहे. मात्र असं असलं तरी ज्या टोलनाक्यावरून संतोष देशमुख यांचं अपहरण झालं त्याच टोलनाक्यावरून २८ मे रोजी आवादा कंपनीचे मॅनेजरचे देखील अपहरण झाल्याची धक्कादायक बातमी मिळाली आहे.


मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं ९ डिसेंबर रोजी अपहरण होऊन त्यांची हत्या करण्यात आली. मात्र या हत्येच्या वादाला जिथून सुरुवात झाली त्या आवादा कंपनीच्या मॅनेजरचे २८ मे रोजी अपहरण झाले होते. हे अपहरण आंबेजोगाई रोडवरील टोलनाक्यावरून झाले होते असल्याची माहिती समोर आली आहे.



देशमुखांच्या हत्येआधी नेमकं काय घडलं ??


६ डिसेंबरला आवादा एनर्जी या पवनचक्की प्रकल्पाच्या कार्यालयामध्ये सुदर्शन घुले आणि त्याचे साथीदार हे खंडणी मागण्यासाठी गेले असता तेथील सुरक्षा रक्षक अशोक सोनवणे यांना मारहाण केली. त्यामुळे त्याने मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि त्या ठिकाणी संतोष देशमुख आणि त्यांचे साथीदार भांडण सोडवण्यासाठी गेले. मात्र तिथे परत भांडण वाढले आणि यात दोन गटात भांडण झाले. त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. त्यानंतर ९ डिसेंबरला दुपारी तीन वाजता संतोष देशमुख यांचं टोलनाक्यावरून काळ्या स्कार्पिओ गाडीतून आलेल्या मारेकर्‍यांनी अपहरण केले. अपहरण झाल्यानंतर संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख याने पोलिसांकडे तक्रार केली असता पोलिसांनी शोध सुरु केला. याच दरम्यान सायंकाळी साडेसहा वाजता संतोष देशमुख यांचा मृतदेह दैठणा फाटा या ठिकाणी सापडला होता. या प्रकरणात ७ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Comments
Add Comment

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

पाणी समजून प्यायलं थिनर; चार वर्षांच्या चिमुकल्याच्या तोंडापासून ते पोटापर्यंत...

ठाणे : ठाण्याच्या इंदिरानगरमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. चार वर्षाच्या चिमुकल्याने चुकून पाणी समजून

मराठमोळ्या मुलीशी लग्न करुन आता पत्नीला बुरख्यातच ठेवतो; म्हणाल्या, पुरुष स्त्रियांकडे...

मुंबई: प्रसिद्ध युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अदनान शेख सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत