Santosh Deshmukh Murder Case : आंबेजोगाई रोडवरील टोलनाका कि अपहरण केंद्र ??

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी मुख्य आरोपी कोण आणि त्याला शिक्षा कधी होणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. या घटनेप्रकरणात पोलिसांचा तपास अजूनही सुरु आहे. मात्र असं असलं तरी ज्या टोलनाक्यावरून संतोष देशमुख यांचं अपहरण झालं त्याच टोलनाक्यावरून २८ मे रोजी आवादा कंपनीचे मॅनेजरचे देखील अपहरण झाल्याची धक्कादायक बातमी मिळाली आहे.


मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं ९ डिसेंबर रोजी अपहरण होऊन त्यांची हत्या करण्यात आली. मात्र या हत्येच्या वादाला जिथून सुरुवात झाली त्या आवादा कंपनीच्या मॅनेजरचे २८ मे रोजी अपहरण झाले होते. हे अपहरण आंबेजोगाई रोडवरील टोलनाक्यावरून झाले होते असल्याची माहिती समोर आली आहे.



देशमुखांच्या हत्येआधी नेमकं काय घडलं ??


६ डिसेंबरला आवादा एनर्जी या पवनचक्की प्रकल्पाच्या कार्यालयामध्ये सुदर्शन घुले आणि त्याचे साथीदार हे खंडणी मागण्यासाठी गेले असता तेथील सुरक्षा रक्षक अशोक सोनवणे यांना मारहाण केली. त्यामुळे त्याने मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि त्या ठिकाणी संतोष देशमुख आणि त्यांचे साथीदार भांडण सोडवण्यासाठी गेले. मात्र तिथे परत भांडण वाढले आणि यात दोन गटात भांडण झाले. त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. त्यानंतर ९ डिसेंबरला दुपारी तीन वाजता संतोष देशमुख यांचं टोलनाक्यावरून काळ्या स्कार्पिओ गाडीतून आलेल्या मारेकर्‍यांनी अपहरण केले. अपहरण झाल्यानंतर संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख याने पोलिसांकडे तक्रार केली असता पोलिसांनी शोध सुरु केला. याच दरम्यान सायंकाळी साडेसहा वाजता संतोष देशमुख यांचा मृतदेह दैठणा फाटा या ठिकाणी सापडला होता. या प्रकरणात ७ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये