Harsha Richhariya : सुंदर साध्वीचा महाकुंभ सोडून जाण्याचा निर्णय पक्का!

प्रयागराज : ह्यावर्षी महाकुंभ मेळाव्यात लाखो भक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली. अनेकांनी पवित्र स्नान देखील केलं. या महाकुंभ मेळाव्यात काहीजण चर्चेचा विषयही ठरले आहेत. त्यातील एक हर्षा रिछारिया हे नाव जोरदार चर्चेत आहे. हर्षा रिछारियाला सोशल मीडियावर सर्वात सुंदर साध्वीचा टॅगही देण्यात आला आहे. कुंभमधील ३० वर्षीय हर्षाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, सर्वांना तिच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. अशातच प्रत्येक लहान-मोठ्या माध्यमांनी तिची मुलाखत घेतली ज्यामध्ये तिने साध्वी होण्याचा निर्णय का घेतला? असे विचारण्यात आलं. या प्रश्नाचं उत्तर देताना तिने ती साध्वी नसल्याचं स्पष्ट केलं आहे.



महाकुंभात प्रवेश करताना हीच देखणी साध्वी आराखड्याच्या रथावर बसलेली दिसली. यावरून काहींनी प्रश्न निर्माण केले होते. काही संतांनी हर्षाच्या रथावर बसण्यावर आणि भगवे कपडे परिधान करण्यावर आक्षेप घेतला. हा वाद इतका वाढला आहे की, हर्षा रिछारियाने ढसाढसा रडत महाकुंभ सोडण्याची घोषणा केली आहे.





हर्षाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती ढसाढसा रडताना पाहायला मिळत आहे. त्या व्हिडीओमध्ये ती म्हणाली, " जी मुलगी या पवित्र कुंभामध्ये धर्माशी जोडून घेण्यासाठी, धर्म जाणून घेण्यासाठी सनातन संस्कृती जाणून घेण्यासाठी इथे आली तिला तुम्ही संपूर्ण कुंभ मेळाव्यात राहण्याच्या स्थितीतही सोडलं नाही. पाप पुण्याचं मला माहित नाही, पण आनंद स्वरूपजींनी जे काही केलं त्याचं पाप त्यांना नक्कीच लागेल. तुम्ही हा पवित्र कुंभ माझ्याकडून हिसकावून घेतला आहे. तो कुंभ जो आपल्या आयुष्यात एकदाच येतो. माझी नेमकी चूक काय आहे?, मला टार्गेट केलं जात आहे. अशा परिस्थितीत, २४ तास या कॉटेजला पाहण्यापेक्षा मी येथून निघून जाणं माझ्यासाठी चांगलं आहे."

Comments
Add Comment

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे