Major Dhyan Chand Khel Ratna Award : क्रीडा विश्वातून आनंदाची बातमी! पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वोच्च काम करणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली : भारताच्या क्रीडा क्षेत्रातून कौतुकास्पद बातमी समोर आली आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी कोट्यवधी भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. भारताची नेमबाज मनू भाकरच्या कौशल्याने मोठा इतिहास रचला आहे. मनू भाकरने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक, तसेच १० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात कांस्यपदक तर एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत २ पदकांची कमाई करणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरली होती. तिच्या या कामगिरीवर भारतवासी खुश होते.



या शानदार कामगिरीनंतर तिला खेलरत्न पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं. दरम्यान शुक्रवारी भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते खेल रत्न पुरस्कार देण्यात आला आहे. तसेच भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगचाही सन्मान करण्यात आला आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाला पदक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक १० गोल केले होते. त्याच्या या लक्षणीय खेळासाठी त्याला खेल रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.



यासह भारताचा पॅरा ॲथलिट प्रवीणने पॅरिस पॅरिलिम्पिक स्पर्धेतील T64 श्रेणीत सुवर्ण पदकाला गवसणी घातली होती. प्रवीणलाही राष्ट्रपतींच्या हस्ते खेल रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.



त्याचबरोबर बुद्धिबळाचा राजा ठरलेल्या डी. गुकेशला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्याच्या या कामगिरीने गुकेशच्या परिवारासह देशाचीही मान अभिमानाने उंचावली आहे.

Comments
Add Comment

Rajasthan factory blaze : राजस्थान हादरलं! अलवारमध्ये बेकायदेशीर फटाका कारखान्याला भीषण आग; ८ कामगारांचा होरपळून मृत्यू

अलवार : राजस्थानच्या अलवार जिल्ह्यातील भिवाडी औद्योगिक क्षेत्रात सोमवारी एका बेकायदेशीर फटाका कारखान्याला

Narendra Modi: डिजिटल क्षेत्रात भारताची जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल; भारताच्या मुक्त व्यापार करारामुळे उद्योगांना मोठा फायदा

नवी दिल्ली: भारताच्या अर्थव्यवस्थेतील पुढील मोठ्या बदलात खासगी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल.

Weather check: देशातील 'या' सात राज्यांना मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

नवी दिल्ली: देशातील बहुतांश भागांमध्ये अचानक वाढलेल्या तापमानामुळे थंडीचा प्रभाव लक्षणीयरीत्या कमी झाला आहे.

Shoaib Akhtar On IND VS PAK Match: 'भारतीय संघ विश्वचषक जिंकण्यासाठी आला होता', पाकिस्तानच्या पराभवानंतर शोएब अख्तर प्रतिक्रिया समोर, पाकिस्तानला काय म्हणाला?

मुंबई: भारतीय संघाने पुन्हा एकदा रविवारीच्या इतिहासाची पुनरावृत्ती केली, पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला. टी-२०

IND vs PAK : पाकिस्तानचा पराभव होताच मोहसीन नक्वी मागच्या दाराने पळाला

मुंबई: श्रीलंकेच्या आर प्रेमदासा स्टेडिअमवर भारताने पाकिस्तानचा ६१ धावांनी पराभव केला आहे. भारताने

भोपाळमध्ये पत्नीने प्रेयसीला विकला पती, जुदाई सिनेमाची पुनरावृत्ती

भोपाळ : श्रीदेवी, उर्मिला मातोंडकर आणि अनिल कपूर यांचा जुदाई हा हिंदी सिनेमा ९० च्या दशकात प्रदर्शित झाला. या