Major Dhyan Chand Khel Ratna Award : क्रीडा विश्वातून आनंदाची बातमी! पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वोच्च काम करणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली : भारताच्या क्रीडा क्षेत्रातून कौतुकास्पद बातमी समोर आली आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी कोट्यवधी भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. भारताची नेमबाज मनू भाकरच्या कौशल्याने मोठा इतिहास रचला आहे. मनू भाकरने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक, तसेच १० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात कांस्यपदक तर एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत २ पदकांची कमाई करणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरली होती. तिच्या या कामगिरीवर भारतवासी खुश होते.



या शानदार कामगिरीनंतर तिला खेलरत्न पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं. दरम्यान शुक्रवारी भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते खेल रत्न पुरस्कार देण्यात आला आहे. तसेच भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगचाही सन्मान करण्यात आला आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाला पदक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक १० गोल केले होते. त्याच्या या लक्षणीय खेळासाठी त्याला खेल रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.



यासह भारताचा पॅरा ॲथलिट प्रवीणने पॅरिस पॅरिलिम्पिक स्पर्धेतील T64 श्रेणीत सुवर्ण पदकाला गवसणी घातली होती. प्रवीणलाही राष्ट्रपतींच्या हस्ते खेल रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.



त्याचबरोबर बुद्धिबळाचा राजा ठरलेल्या डी. गुकेशला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्याच्या या कामगिरीने गुकेशच्या परिवारासह देशाचीही मान अभिमानाने उंचावली आहे.

Comments
Add Comment

‘मी तुमच्या मुलीच्या वयाची आहे’; स्टेजवरूनच प्रांजल दहियाने गैरवर्तन करण्याऱ्या प्रेक्षकांना सुनावले खडेबोल

हरियाणा : हरियाणाची प्रसिद्ध गायिका आणि नृत्यांगना प्रांजल दहिया सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. एका लाइव्ह

टाटा–एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेसला भीषण आग, २० हून अधिक प्रवासी जखमी, १ मृत्यू

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशातील अनाकापल्ली जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री भीषण रेल्वे अपघात घडला.

चिनाब नदीवर जलविद्युत प्रकल्पासाठी निविदा िनघणार

पाकिस्तानचे पाणी थांबणार नवी दिल्ली : भारताने जम्मू-कश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील चिनाब नदीवर २६० मेगावॅट

राहुल बाबा, इतक्यात थकू नका; अजून बरेच पराभव पाहायचे आहेत

गृहमंत्री अमित शहा यांचा टोला अहमदाबाद : "काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वारंवार होणाऱ्या पराभवामुळे आताच थकून

पॅराग्लायडिंग करताना अपघात, पर्यटकासह दोघे आकाशातून कोसळले, एकाचा मृत्यू

बीर बिलिंग : पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचल प्रदेशातील 'बीर बिलिंग'मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे.

'मन की बात'मधून पंतप्रधान मोदींनी घेतला वर्षभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच रविवार २८ डिसेंबर २०२५ रोजी १२९ व्या 'मन की बात'