बीजापूर : छत्तीसगडमधील बीजापूरमध्ये सुरक्षा पथक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाले. चकमक अद्याप सुरू आहे. यामुळे ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्हा राखीव रक्षक (District Reserve Guard), केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कोब्रा पथकाची पाचवी बटालियन (Commando Battalion for Resolute Action) आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाची २२९ वी बटालियन (Central Reserve Police Force) यांनी संयुक्त कारवाई केली.
सुरक्षा पथकांच्या मोहिमेत जानेवारी महिन्यात आतापर्यंत २६ नक्षलवादी ठार झाले आहेत. याआधी १२ जानेवारी रोजी बीजापूर जिल्ह्यातील मद्देड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक चकमक झाली होती. या चकमकीत दोन महिला नक्षलवाद्यांसह एकूण पाच नक्षलवादी ठार झाले होते. मागच्या एका वर्षात छत्तीसगडमध्ये २१९ नक्षलवादी ठार झाले होते. सुरक्षा पथकांना मिळू लागलेल्या यशामुळे छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांच्या कारवाया मंदावल्या आहेत.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…