छत्तीसगडमधील बीजापूरमध्ये १२ नक्षलवादी ठार

बीजापूर : छत्तीसगडमधील बीजापूरमध्ये सुरक्षा पथक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाले. चकमक अद्याप सुरू आहे. यामुळे ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्हा राखीव रक्षक (District Reserve Guard), केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कोब्रा पथकाची पाचवी बटालियन (Commando Battalion for Resolute Action) आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाची २२९ वी बटालियन (Central Reserve Police Force) यांनी संयुक्त कारवाई केली.



सुरक्षा पथकांच्या मोहिमेत जानेवारी महिन्यात आतापर्यंत २६ नक्षलवादी ठार झाले आहेत. याआधी १२ जानेवारी रोजी बीजापूर जिल्ह्यातील मद्देड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक चकमक झाली होती. या चकमकीत दोन महिला नक्षलवाद्यांसह एकूण पाच नक्षलवादी ठार झाले होते. मागच्या एका वर्षात छत्तीसगडमध्ये २१९ नक्षलवादी ठार झाले होते. सुरक्षा पथकांना मिळू लागलेल्या यशामुळे छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांच्या कारवाया मंदावल्या आहेत.
Comments
Add Comment

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या