छत्तीसगडमधील बीजापूरमध्ये १२ नक्षलवादी ठार

बीजापूर : छत्तीसगडमधील बीजापूरमध्ये सुरक्षा पथक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाले. चकमक अद्याप सुरू आहे. यामुळे ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्हा राखीव रक्षक (District Reserve Guard), केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कोब्रा पथकाची पाचवी बटालियन (Commando Battalion for Resolute Action) आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाची २२९ वी बटालियन (Central Reserve Police Force) यांनी संयुक्त कारवाई केली.



सुरक्षा पथकांच्या मोहिमेत जानेवारी महिन्यात आतापर्यंत २६ नक्षलवादी ठार झाले आहेत. याआधी १२ जानेवारी रोजी बीजापूर जिल्ह्यातील मद्देड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक चकमक झाली होती. या चकमकीत दोन महिला नक्षलवाद्यांसह एकूण पाच नक्षलवादी ठार झाले होते. मागच्या एका वर्षात छत्तीसगडमध्ये २१९ नक्षलवादी ठार झाले होते. सुरक्षा पथकांना मिळू लागलेल्या यशामुळे छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांच्या कारवाया मंदावल्या आहेत.
Comments
Add Comment

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च