मकर संक्रांतीला ३.५० कोटी भाविकांनी केले अमृत स्नान

  75

प्रयागराज: उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथे आयोजित महाकुंभाच्या दुसऱ्या दिवशी आज, मंगळवारी तब्बल ३ कोटी ५० लाख भाविकांनी त्रिवेणी संगमात अमृत स्थान केले. यात १३ आखाड्यातील साधू-संत देखील सहभागी झाले होते.


यासंदर्भात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विटरवर (एक्स) जारी केलेल्या संदेशात सांगितले की, श्रद्धेचा भव्य संगम असलेल्या महाकुंभ मेळ्यात मकर संक्रांतीच्या शुभ प्रसंगी पवित्र संगमात श्रद्धेने स्नान करणाऱ्या सर्व पूजनीय संत, कल्पवासी आणि भक्तांचे हार्दिक अभिनंदन, समानता आणि एकता. आज, पहिल्या अमृत स्नान महोत्सवात, ३.५० कोटींहून अधिक साधू-संत आणि भाविकांनी त्रिवेणी स्नानाचा पवित्र लाभ घेतला.

पहिल्या स्नानोत्सवाच्या यशस्वी पूर्ततेबद्दल, सनातन धर्मावर आधारित सर्व आदरणीय आखाडे, न्याय प्रशासन, स्थानिक पोलिस आणि प्रशासन, स्वच्छता कर्मचारी, स्वयंसेवी संस्था आणि धार्मिक संस्था यांचे मनापासून आभार आणि अभिनंदन करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे. प्रयागराजमध्ये दर १२ वर्षांनी पूर्ण कुंभ आयोजित केला जातो आणि जेव्हा १२ पूर्ण कुंभ असतात तेव्हा हा महाकुंभ १४४ वर्षांनी येतो. महाकुंभात स्नान करण्याची संधी खूप भाग्यवान लोकांना मिळते. महाकुंभाच्या निमित्ताने महानिर्वाणी आखाड्यातील ६८ महामंडलेश्वर आणि हजारो संतांनी अमृत स्नान केले.

Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या