मकर संक्रांतीला ३.५० कोटी भाविकांनी केले अमृत स्नान

प्रयागराज: उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथे आयोजित महाकुंभाच्या दुसऱ्या दिवशी आज, मंगळवारी तब्बल ३ कोटी ५० लाख भाविकांनी त्रिवेणी संगमात अमृत स्थान केले. यात १३ आखाड्यातील साधू-संत देखील सहभागी झाले होते.


यासंदर्भात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विटरवर (एक्स) जारी केलेल्या संदेशात सांगितले की, श्रद्धेचा भव्य संगम असलेल्या महाकुंभ मेळ्यात मकर संक्रांतीच्या शुभ प्रसंगी पवित्र संगमात श्रद्धेने स्नान करणाऱ्या सर्व पूजनीय संत, कल्पवासी आणि भक्तांचे हार्दिक अभिनंदन, समानता आणि एकता. आज, पहिल्या अमृत स्नान महोत्सवात, ३.५० कोटींहून अधिक साधू-संत आणि भाविकांनी त्रिवेणी स्नानाचा पवित्र लाभ घेतला.

पहिल्या स्नानोत्सवाच्या यशस्वी पूर्ततेबद्दल, सनातन धर्मावर आधारित सर्व आदरणीय आखाडे, न्याय प्रशासन, स्थानिक पोलिस आणि प्रशासन, स्वच्छता कर्मचारी, स्वयंसेवी संस्था आणि धार्मिक संस्था यांचे मनापासून आभार आणि अभिनंदन करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे. प्रयागराजमध्ये दर १२ वर्षांनी पूर्ण कुंभ आयोजित केला जातो आणि जेव्हा १२ पूर्ण कुंभ असतात तेव्हा हा महाकुंभ १४४ वर्षांनी येतो. महाकुंभात स्नान करण्याची संधी खूप भाग्यवान लोकांना मिळते. महाकुंभाच्या निमित्ताने महानिर्वाणी आखाड्यातील ६८ महामंडलेश्वर आणि हजारो संतांनी अमृत स्नान केले.

Comments
Add Comment

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या