मकर संक्रांतीला ३.५० कोटी भाविकांनी केले अमृत स्नान

प्रयागराज: उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथे आयोजित महाकुंभाच्या दुसऱ्या दिवशी आज, मंगळवारी तब्बल ३ कोटी ५० लाख भाविकांनी त्रिवेणी संगमात अमृत स्थान केले. यात १३ आखाड्यातील साधू-संत देखील सहभागी झाले होते.


यासंदर्भात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विटरवर (एक्स) जारी केलेल्या संदेशात सांगितले की, श्रद्धेचा भव्य संगम असलेल्या महाकुंभ मेळ्यात मकर संक्रांतीच्या शुभ प्रसंगी पवित्र संगमात श्रद्धेने स्नान करणाऱ्या सर्व पूजनीय संत, कल्पवासी आणि भक्तांचे हार्दिक अभिनंदन, समानता आणि एकता. आज, पहिल्या अमृत स्नान महोत्सवात, ३.५० कोटींहून अधिक साधू-संत आणि भाविकांनी त्रिवेणी स्नानाचा पवित्र लाभ घेतला.

पहिल्या स्नानोत्सवाच्या यशस्वी पूर्ततेबद्दल, सनातन धर्मावर आधारित सर्व आदरणीय आखाडे, न्याय प्रशासन, स्थानिक पोलिस आणि प्रशासन, स्वच्छता कर्मचारी, स्वयंसेवी संस्था आणि धार्मिक संस्था यांचे मनापासून आभार आणि अभिनंदन करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे. प्रयागराजमध्ये दर १२ वर्षांनी पूर्ण कुंभ आयोजित केला जातो आणि जेव्हा १२ पूर्ण कुंभ असतात तेव्हा हा महाकुंभ १४४ वर्षांनी येतो. महाकुंभात स्नान करण्याची संधी खूप भाग्यवान लोकांना मिळते. महाकुंभाच्या निमित्ताने महानिर्वाणी आखाड्यातील ६८ महामंडलेश्वर आणि हजारो संतांनी अमृत स्नान केले.

Comments
Add Comment

दिल्लीत ५ रुपयांत मिळेल जेवण अटल कॅन्टीन सुरू

१०० ठिकाणी स्टॉल, प्रत्येक स्टॉलमध्ये ५०० लोकांसाठी जेवणाची सोय नवी दिल्ली : दिल्ली सरकारने माजी पंतप्रधान

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले

लष्कराच्या जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी

ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट... नवी दिल्ली : भारतीय लष्कराने आपल्या सोशल मीडिया वापराच्या धोरणात महत्त्वाचा बदल केला

'पतीने पत्नीचा फोन फोडणे गैर नाही'

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाकडून घटस्फोटाचा निर्णय कायम जबलपूर : "कोणत्याही पतीला आपली पत्नी व्यभिचारात

ग्रीन टीला यापुढे ‘चहा’ म्हणणे बेकायदा !

भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचा निर्णय नवी दिल्ली : ग्रीन टीला आता ‘चहा’ म्हणणे बेकायदेशीर आहे, असे