मकर संक्रांतीला ३.५० कोटी भाविकांनी केले अमृत स्नान

प्रयागराज: उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथे आयोजित महाकुंभाच्या दुसऱ्या दिवशी आज, मंगळवारी तब्बल ३ कोटी ५० लाख भाविकांनी त्रिवेणी संगमात अमृत स्थान केले. यात १३ आखाड्यातील साधू-संत देखील सहभागी झाले होते.


यासंदर्भात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विटरवर (एक्स) जारी केलेल्या संदेशात सांगितले की, श्रद्धेचा भव्य संगम असलेल्या महाकुंभ मेळ्यात मकर संक्रांतीच्या शुभ प्रसंगी पवित्र संगमात श्रद्धेने स्नान करणाऱ्या सर्व पूजनीय संत, कल्पवासी आणि भक्तांचे हार्दिक अभिनंदन, समानता आणि एकता. आज, पहिल्या अमृत स्नान महोत्सवात, ३.५० कोटींहून अधिक साधू-संत आणि भाविकांनी त्रिवेणी स्नानाचा पवित्र लाभ घेतला.

पहिल्या स्नानोत्सवाच्या यशस्वी पूर्ततेबद्दल, सनातन धर्मावर आधारित सर्व आदरणीय आखाडे, न्याय प्रशासन, स्थानिक पोलिस आणि प्रशासन, स्वच्छता कर्मचारी, स्वयंसेवी संस्था आणि धार्मिक संस्था यांचे मनापासून आभार आणि अभिनंदन करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे. प्रयागराजमध्ये दर १२ वर्षांनी पूर्ण कुंभ आयोजित केला जातो आणि जेव्हा १२ पूर्ण कुंभ असतात तेव्हा हा महाकुंभ १४४ वर्षांनी येतो. महाकुंभात स्नान करण्याची संधी खूप भाग्यवान लोकांना मिळते. महाकुंभाच्या निमित्ताने महानिर्वाणी आखाड्यातील ६८ महामंडलेश्वर आणि हजारो संतांनी अमृत स्नान केले.

Comments
Add Comment

सिंगापूर न्यायालयाने झुबीन गर्ग यांचा मृत्यू अपघाती ठरवला; कोणताही घातपात नसल्याचा निष्कर्ष

नवी दिल्ली : सिंगापूर कोरोनर कोर्टाने प्रसिद्ध आसामी गायक झुबीन गर्ग यांच्या मृत्यू प्रकरणी आपला अंतिम निकाल

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल १०० डॉलरच्या खाली घसरल्या

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील शांततेच्या आशेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती आज पुन्हा एकदा

मद्यप्रेमींच्या खिशाला लागणार कात्री, बिअर आणि दारुच्या किमती वाढणार?

मुंबई: दारु पिणाऱ्यांच्या खिशाला लवकरच कात्री लागू शकते. कारण दारुच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सततच्या आजारपणाने त्रस्त झाल्या सोनिया गांधी

नवी दिल्ली : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांना तब्येत बिघडल्यामुळे मंगळवारी

कर्नाटकात खळबळ, माजी आमदाराच्या मुलाची हत्या; जळालेल्या कारमध्ये...

धारवाड: कर्नाटकच्या धारवाडजवळील एका निर्जनस्थळी जळालेल्या कारमध्ये कोळसा झालेला मृतदेह सापडल्याने हत्येचा

Indian Railway Rules: रेल्वे तिकीट आठ दिवसांपूर्वी रद्द केल्यावर रिफंड...; रेल्वेच्या नियमांत महत्त्वाचा बदल

नवी दिल्ली: केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी रेल्वे तिकीट प्रणाली आणि प्रवाशांच्या