Walmik Karad Update : लेकाला न्याय मिळावा यासाठी वाल्मिक कराडच्या मातोश्री मैदानात उतरल्या

  144

बीड : मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील दररोज नवीन अपडेट समोर येत आहेत. देशमुखांच्या हत्येप्रकरणात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून. या हत्येचा मास्टर माईंड वाल्मिक कराड हा १ जानेवारी रोजी पोलिसांना शरण आला होता. मात्र आता त्याला न्याय मिळावा यासाठी त्याच्या मातोश्रींनी आंदोलन केले आहे.


वाल्मिक कराडला याआधी १४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली होती. आज वाल्मिक कराडला केज जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. अशातच वाल्मिक कराडच्या मातोश्रींनी राजकीय सूडबुद्धीने आणि जातीय द्वेषातून कारवाई होत असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्याचबरोबर लेकाच्या न्यायासाठी परळी पोलीस स्टेशनबाहेर त्यांनी ठिय्या आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. वाल्मिक कराडच्या आईसोबतच वाल्मिक कराडचे समर्थक सुद्धा आता आक्रमक झालेले दिसत आहेत. त्यांनी सुद्धा टॉवर चढून आंदोलनाला सुरवात केली आहे.



एकीकडे संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी त्यांचा भाऊ धनंजय देशमुखने काल (दि. १३) पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले होते. आधीची एसआयटी टीम आरोपींच्या संपर्कात असल्याने ती बदलावी या त्यांच्या मागणीची आज पूर्तता होऊन १ जानेवारीला नेमलेली एसआयटी रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी सात जणांची एसआयटी स्थापन करण्यात आलीय.


दरम्यान आता वाल्मिक कराडला सीआयडी कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडी? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक