Ratnagiri News : विद्येच्या मंदिरात शिक्षकानेच केले विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन

रत्नागिरी : रत्नागिरीतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. ज्ञानाच्या मंदिरात विद्यार्थिनीसोबतच शिक्षकाने गैरवर्तन केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला असून शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत. तर शैक्षणिक संस्थेकडून या नराधम कंत्राटी शिक्षकाचे तातडीने निलंबन करण्यात आले आहे.



रत्नागिरी शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या एका शाळेत शिक्षकाने विद्यार्थिनीसोबतच गैरवर्तन केले आहे. याबाबत पीडित मुलीने पालकांना सांगताच पालकांनी थेट शिक्षकाला घेरून त्याला जाब विचारत चांगलाच चोप दिला आहे. या गंभीर घटनेची माहिती मिळताच संस्थेच्या पदाधिकारी शाळेत दाखल झाले. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ शिक्षकाचे निलंबन केले. कंत्राटी तत्वावर असलेल्या संशयित शिक्षकाने शिक्षकाने मुलीसोबत गैरकृत्य केल्याचे समजताच पालक चांगलेच संतापले आहेत.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित नराधमाला बेड्या ठोकल्या आहे. तर पोलिसांच्या माहितीनुसार मंगळवारी संबंधित कंत्राटी शिक्षकाला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Comments
Add Comment

जनगणना २०२७च्या पूर्वचाचणीसाठी चेंबूरमध्ये १३५ प्रगणक, २२ पर्यवेक्षकांची नेमणूक

मुंबई (खास प्रतिनिधी) - जनगणनेच्या तयारीचा एक भाग म्हणून, मुंबई महानगरपालिकेच्या एम पश्चिम विभागात पूर्वचाचणी

राणीबागेत बोन्साय आणि ओरिगामी कला प्रदर्शन

मुंबई (खास प्रतिनिधी) : निसर्गसौंदर्य आणि सर्जनशीलतेचा अनोखा मिलाफ नोव्हेंबरच्या अखेरीस मुंबईकरांना अनुभवायला

विख्यात कंपनी अनंत राजकडून डेटा सेंटर उभारण्यासाठी ४५०० कोटी गुंतवणूकीची घोषणा

प्रतिनिधी: विख्यात रिअल्टी कंपनी अनंत राज लिमिटेडने आपल्या पोर्टफोलिओ विस्तार करण्यासाठी आंध्र प्रदेशात

Utakarsh Small Finance Bank Q2Results: उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा तिमाही निकाल जाहीर यंदा तिमाहीत बँकेला ३४८ कोटींचा निव्वळ तोटा

मोहित सोमण: उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेने आपला तिमाही निकाल आज जाहीर केला आहे. या निकालातील माहितीनुसार, बँकेला

सनातन एकता पदयात्रेदरम्यान बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री यांची प्रकृती चिंताजनक

मथुरा : सनातन एकता पदयात्रेच्या आठव्या दिवशी बागेश्वर धामाचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ

उत्पन्ना एकादशीचे महत्त्व आणि पाळा हे नियम! जाणून घ्या सविस्तर...

दर महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशीला उपवास आणि व्रत केले जाते. प्रत्येक एकादशीला विशिष्ट असे