Ratnagiri News : विद्येच्या मंदिरात शिक्षकानेच केले विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन

रत्नागिरी : रत्नागिरीतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. ज्ञानाच्या मंदिरात विद्यार्थिनीसोबतच शिक्षकाने गैरवर्तन केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला असून शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत. तर शैक्षणिक संस्थेकडून या नराधम कंत्राटी शिक्षकाचे तातडीने निलंबन करण्यात आले आहे.



रत्नागिरी शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या एका शाळेत शिक्षकाने विद्यार्थिनीसोबतच गैरवर्तन केले आहे. याबाबत पीडित मुलीने पालकांना सांगताच पालकांनी थेट शिक्षकाला घेरून त्याला जाब विचारत चांगलाच चोप दिला आहे. या गंभीर घटनेची माहिती मिळताच संस्थेच्या पदाधिकारी शाळेत दाखल झाले. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ शिक्षकाचे निलंबन केले. कंत्राटी तत्वावर असलेल्या संशयित शिक्षकाने शिक्षकाने मुलीसोबत गैरकृत्य केल्याचे समजताच पालक चांगलेच संतापले आहेत.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित नराधमाला बेड्या ठोकल्या आहे. तर पोलिसांच्या माहितीनुसार मंगळवारी संबंधित कंत्राटी शिक्षकाला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Comments
Add Comment

महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

दिलीप प्रभावळकरांच्या ‘दशावतार’ ची आता मल्याळम भाषेत धडाकेबाज एन्ट्री!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत यंदा एकाच चित्रपटाची सर्वाधिक चर्चा झाली तो म्हणजे ‘दशावतार’! १२ सप्टेंबर २०२५

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीने केली पतीची हत्या! पत्नीचे नगरसेवक होण्याचे स्वप्न, पती संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी...

पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये समाजकार्यात सक्रिय असणारे नकुल भोईर (वय ४०) यांची हत्या करण्यात आली आहे. नकुल भोईर यांची

खासदार नारायण राणे यांचा चिपळूण, देवरूख, रत्नागिरीत जनता दरबार

रत्नागिरी: जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार

दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावर दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.