Health: थंडीच्या दिवसांत खाऊनपिऊन वजन करा कमी

मुंबई: थंडीच्या दिवसांत आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे असते. खासकरून या मोसमात वजन वाढणे ही सामान्य समस्या आहे. थंडीच्या दिवसांत वजन घटवण्याची प्रक्रिया मंदावते. सगळ्यात मोठी बाब म्हणजे या दिवसांमध्ये आपली फिजीकल अॅक्टिव्हिटीही कमी होते. तसेच पाणीही कमी प्यायले जाते. तसेच खाणेपिणेही वाढते..


सूर्याचा प्रकाश कमी झाल्याने शरीरात व्हिटामिन डीची कमतरता जाणवते. या सर्व कारणांमुळे मेटाबॉलिज्मवरही परिणाम होतो. अशातच तुम्ही थंडीच्या दिवसांत वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तसेच बेली फॅट कमी करायाचे असेल तर आम्ही तुम्हाला काही टिप्स देत आहोत.



घरात एक्सरसाईज करा


जर थंडीच्या दिवसांत जिम जायची इच्छा होत नसेल अथवा फिरायला जायला जमत नसेल तर अॅक्टिव्ह राहण्यासाठी घरच्या घरी व्यायाम करा. घरातच योगा करा. योग सगळ्यात चांगला व्यायाम आहे. सूर्य नमस्कार करा. ब्रिस्क वॉक करा. दोरीउड्या, पायऱ्या चढणे, डान्स करणे अशा व्यायामांमुळे तुम्ही थंडीच्या दिवसांतही अॅक्टिव्ह राहू शकता.



थोडे थोडे खा


एकदम तीनवेळा भरपेट जेवण्यापेक्षा थोडे थोडे खा. यामुळे दीर्घकाळ तुमचे पोट भरलेले राहील आणि जंक फूड कमी खाल. तसेच जेवण स्किप करू नका.



भरपूर पाणी प्या


थंडीच्या दिवसांत आपण पाणी कमी पितो. मात्र ही चूक केल्याने शरीरावर त्याचा परिणाम होतो. पाण्याच्या कमतरतेमुळे शरीर डिहायड्रेट होते यामुळे मेटाबॉलिज्मचा वेग मंदावतो आणि शरीरासाठी वजन घटवणे कठीण होते. थंडीच्या दिवसांत तुम्ही कोमट पाण्याचे सेवन करू शकता. यामुळे शरीरातील फॅट ककमी होऊन रक्तसंचलन व्यवस्थित होण्यास मदत होते. यासोबतच फॅट कमी करण्यासाठी तुम्ही कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध मिसळून प्या. याशिवाय तुम्ही यात चिया सीड्सही मिसळू शकता.

Comments
Add Comment

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण