Torres Scam Update : टोरेस घोटाळा प्रकरणी तपासाची सूत्र ईडीच्या हाती!

मुंबई : टोरेस घोटाळा प्रकरणाची तपासाची सूत्र आता ईडीच्या हाती सोपवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अखेर ईडीने गुन्हा दाखल करत तपासल सुरूवात केली आहे. टोरेस गैरव्यवहार प्रकरणची व्याप्ती लक्षात घेऊन ईडीने मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या आधारे ईडीने स्वतंत्र गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. या घोटाळ्यात २ हजारांहून अधिक नागरिक फसले आहेत. तर नागरिकांच्या चौकशीतून ३७ कोटींपर्यंतची फसवणूक आतापर्यंत समोर आलेली आहे.


या प्रकरणाचा पर्दाफाश करणारा व्हिसलब्लोअर्स याने युक्रेनच्या आरोपींनी २०० कोटीहून अधिकची रक्कम परदेशात वळवली आहे असा दावा केलाय. त्यामुळे आता ईडी या प्रकरणात स्वतः हस्तक्षेप करून संशयाचा एक एक धागा विस्कटून आरोपींचा छडा लावणार आहे.



आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या प्रकरणात सहभागी असलेले १० विदेशी नागरिक फरार आहेत. त्यांच्या विरोधात लुक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं आहे. काही जण घोटाळा उघड होण्यापूर्वीच देश सोडून पळून गेले आहेत.


आरोपी पळून जाण्यापूर्वी त्यांनी मोठ्या कल्पकतेने योजना बनवली होती. त्यांच्या नियोजनानुसार ख्रिसमसदरम्यान देश सोडून पळून जायचं होतं. पळून गेलेल्या लोकांचा व्हिसा एका महिन्यापर्यंत संपणार आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत घोटाळा करुन ख्रिसमसच्या काळात देश सोडून पळून जावा, ख्रिसमसच्या कारणावरुन देश सोडून बाहेर गेल्यास कुणाला संशय येणार नाही असं समजून त्यांनी त्यानुसार नियोजन आखलं.


दरम्यान आता ईडी तरी टोरेस गैरव्यवहार प्रकरणी फसवणूक झालेल्या सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देईल का याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात हवामानाचा उलटसुलट खेळ; काही ठिकाणी उष्णतेचा तडाखा, तर ७ जिल्ह्यांत गारपिटीचा धोका

मुंबई : राज्यात सध्या हवामानात सतत बदल होत असून हवामानाचा खेळ पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी उष्णतेची तीव्रता

रेमंडचे एमडी गौतम सिंघानिया यांचा अपघात स्पीडबोट उलटली अन्.... दोघे जण बेपत्ता

मुंबई : उद्योग क्षेत्रातील प्रमुख नाव असलेले रेमंड ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया हे मालदीवमध्ये

प्रलंबित मागण्यांसाठी 'बेस्ट'मधील विविध संघटनांचे अतिरिक्त आयुक्तांकडे गाऱ्हाणे

मुंबई : बेस्ट उपक्रमातील प्रलंबित मागण्यांकडे बेस्ट प्रशासन व मुंबई महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्यामुळे बेस्ट

वरळी बीडीडीतील ८४५ घरांचे एप्रिल महिन्यात वितरण

मुंबई : म्हाडामार्फत मुंबईतील नायगाव, वरळी आणि ना.म.जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास करण्यात येत आहे.

फेरीवाल्यांवरील कारवाईत सहायक आयुक्तांची बोटचेपी भूमिका

ठरावीक भागांमध्ये कारवाई, इतर ठिकाणी फेरीवाल्यांचे धंदे तेजीत मुंबई : मुंबईतील बेकायदेशीर फेरीवाल्यांवर

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लीना मेहेंदळे यांची निवड

मुंबई : नवी दिल्ली येथे आयोजित महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या