Weather Update : राज्यात पुढील तीन दिवस गारठा वाढणार!

मुंबई : राज्यात ढगाळ हवामान झाल्याने गारठा कमी झाला आहे.पुढील काही दिवस धुके आणि ढगाळ हवामान राहणार आहे. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर थंड वाऱ्याचा जोर जास्त राहिल्यास उत्तर महाराष्ट्र, उत्तर विदर्भात किमान थंडी वाढण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवस किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. श्रीलंका आणि भारत दरम्यान असलेल्या कोमोरिन भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. उत्तर भारतात १०० नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत वाहत आहेत.उत्तर भारतात पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत वेगाने येत आहेत. त्यामुळे थंडी कमी-अधिक होत असून, दाट धुक्याचे साम्राज्य कायम आहे.सध्या राज्यातील तापमानाचा पारा १० अंशांच्याही पुढे गेला आहे.



दोन- तीन दिवसांमध्ये राज्यातील गारठा पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.गेले काही राज्याच्या बऱ्याच भागात सकाळी उशिरापर्यंत धुके पाहायला मिळत आहे. ढगाळ हवामान झाल्याने गारठा कमी झाला आहे. सोमवारी (ता. १३) धुळे ८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. उर्वरित राज्यात किमान तापमान १३ अंशांच्या पुढे गेले आहे. राज्यात सोमवारी मालेगावात सर्वांत कमी १३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.पुण्यात १७.१ अंशांवर तापमान होते, तरी पुणेकरांना बोचरी थंडी जाणवत होती.सोमवारी (ता. १३) सकाळपर्यंच्या २४ तासांत सोलापूर येथे ३२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान आज, मंगळवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अंशतः ढगाळ हवामानाचा अंदाज आहे. किमान तापमानात फारसा बदल होणार नाही. मात्र उद्यापासून (ता. १५) तीन दिवस किमान तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे.राज्यातील थंडी पुन्हा वाढायला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.