Pune Metro : पुणेकरांची कमाल! मेट्रोचे खांब विकून २ लाख कमवले; सहा चोर सापडले

पुणे : विद्येचं माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुण्यात चोरी आणि हत्येच्या संख्येत दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. चोरीच्या, गोळीबाराच्या, दहशतीच्या, अशा अनेक घटना दररोज समोर येत आहे. अशातच मेट्रोचे खांब चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. शिवाजीनगरमध्ये चोरट्यांनी दोन लाख रूपयांच्या मेट्रोचे खांब चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांकडून याचा शोध घेतला जातोय.




पुण्यातील शिवाजीनगर भागातील कामगार पुतळा परिसरातून मेट्रोचे दोन लाख रुपयांचे लोखंडी खांब चोरल्याचा प्रकार उघड झालाय. मेट्रो रेल्वेचे खांब चोरणाऱ्या सहा चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. खांब विकून पैसे कमवण्यासाठी हे खांब चोरी केल्याची माहिती समोर आली आहे. दोन लाखांचे असणारे हे खांब चोरी झाल्याचे समजताच मेट्रोचे सुरक्षारक्षक चंद्रकांत शेलार यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. सीसीटीव्ही आणि इतर माहितीच्या आधारावर पोलिसांनी सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांची कसून चौकशी केली जात आहे. दरम्यान यामध्ये अजून कोणाचा हात आहे याचा पोलीस शोध घेत आहे.

Comments
Add Comment

Chhatrapati Sambhajinagar Murder : तलवारीने सपासप वार अन् ३० सेकंदांत…छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवसाढवळ्या तरुणाचा खून

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहराच्या जुन्या भागातील शहाबाजार परिसरात शुक्रवारी (३१

Maharashtra Rain : मोंथाचा मुक्काम लांबला! तुळशीचं लग्न गाजणार, नोव्हेंबर महिनाही पावसाचा; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना IMD चा थेट इशारा!

नोव्हेंबर महिना (November) उजाडला असला तरी, अद्याप पाऊस जाण्याचं नाव घेत नाहीये. मे महिन्यापासून सुरू झालेला हा पाऊस

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारांच्या अध्यक्षतेखाली ‘उच्चाधिकार समिती’ गठीत

मुंबई : शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरुपी सोडवणूक करण्यासाठी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी

राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय जनगणना २०२५ ला प्रारंभ

मुंबई : भारतातील सागरी मत्स्य व्यवसायाला अधिक बळकटी देण्यासाठी व मच्छीमार समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी

“आजच्या तुलनेत आठ महिन्यांनी होणारी कर्जमाफी अधिक फायद्याची” – बच्चू कडू

नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांकडून तात्काळ कर्जमाफीची मागणी होत असताना, आजच्या तुलनेत 8 महिन्यांनी जाहीर होणारी

कार्तिकीसाठी राज्यातील विविध मार्गावरून ५५० एसटी बसेस धावणार

सोलापूर : सावळ्या विठ्ठलाचे भक्त असलेल्या वारकऱ्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून सोलापूरसह सांगली, सातारा,