रत्नागिरी : मंडणगडच्या शेणाळे घाटात लालपरीचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही बस रात्रीच्या सुमारास दाभोळवरून मुंबईच्या दिशेने येत होती. घाटातील उतारावरून जात असताना चालकाचे बस वरील नियंत्रण सुटून बस घरंगळत दरीत कोसळली. मात्र त्या ठिकाणी असलेल्या एका झाडामध्ये एसटी अडकली आणि त्यामुळे मोठे संकट दूर झाले. असे असले तरी या दुर्घटनेत ७ प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एसटी प्रवाशांना घेऊन मंडणगड शेणाळे घाटातून जात होती. या घाटात अति तीव्र वळण असल्याने यापैकी एका उतारातून जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. आणि गाडी दरीच्या दिशेने घरंगळत गेली. दैव बलवत्तर म्हणून तिथे असलेल्या झाडझूडपांमध्ये अडकली. बस वेगाने जात असल्याचा प्रवाशांना अंदाज आल्याने प्रवाशांना जाग आली. आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी हे दृश्य पाहून बचाव पथकाला कळवले. यानंतर बचाव पथकाने घटनास्थळी दाखल होऊन एसटीतील ४१ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. या ४१ प्रवाशांपैकी ७ प्रवासी गंभीर जखमी असल्याचे कळते आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…