Ratnagiri ST Accident : मंडणगडच्या शेणाळे घाटात दाभोळ मुंबई एसटीचा भीषण अपघात!

रत्नागिरी : मंडणगडच्या शेणाळे घाटात लालपरीचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही बस रात्रीच्या सुमारास दाभोळवरून मुंबईच्या दिशेने येत होती. घाटातील उतारावरून जात असताना चालकाचे बस वरील नियंत्रण सुटून बस घरंगळत दरीत कोसळली. मात्र त्या ठिकाणी असलेल्या एका झाडामध्ये एसटी अडकली आणि त्यामुळे मोठे संकट दूर झाले. असे असले तरी या दुर्घटनेत ७ प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार एसटी प्रवाशांना घेऊन मंडणगड शेणाळे घाटातून जात होती. या घाटात अति तीव्र वळण असल्याने यापैकी एका उतारातून जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. आणि गाडी दरीच्या दिशेने घरंगळत गेली. दैव बलवत्तर म्हणून तिथे असलेल्या झाडझूडपांमध्ये अडकली. बस वेगाने जात असल्याचा प्रवाशांना अंदाज आल्याने प्रवाशांना जाग आली. आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी हे दृश्य पाहून बचाव पथकाला कळवले. यानंतर बचाव पथकाने घटनास्थळी दाखल होऊन एसटीतील ४१ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. या ४१ प्रवाशांपैकी ७ प्रवासी गंभीर जखमी असल्याचे कळते आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

Comments
Add Comment

BMC Election Results : २२७ वॉर्डांचे निकाल एकाच वेळी नाहीत, टप्प्याटप्प्याने मतमोजणी

मुंबई : राज्यभरात महापालिका निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले असून, मुंबई महापालिकेच्या (BMC) निकालांकडे संपूर्ण

मराठी भाषेबाबतचा भाजपाचा दृष्टीकोन व्यापक -प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

विरोधकांची मराठी भाषेबाबतची भूमिका नकारात्मक मुंबई :  भाजपाचे मराठी म्हणजे मराठी व्याकरणातल्या अनेकवचन

आर्मर सिक्युरिटी इंडिया आयपीओला पहिल्या दिवशी थंड प्रतिसाद! दुपारपर्यंत केवळ ०.०३ पटीने मिळाले सबस्क्रिप्शन

मोहित सोमण: आजपासून आर्मर सिक्युरिटी इंडिया लिमिटेड (Armour Security India Limited) कंपनीचा आयपीओ (IPO) बाजारात गुंतवणूकदारांसाठी

वर्षभरात १ लाख व्हिसा रद्द; नियम मोडणाऱ्यांना दणका

८ हजार भारतीय विद्यार्थ्यांवरही टांगती तलवार नवी दिल्ली : अमेरिकेला अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि बेकायदेशीर

कॅनडात १४० कोटींच्या सोन्याची चोरी

मास्टरमाईंड भारतात लपल्याचा दावा टोरंटो : टोरंटो पिअरसन आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या २ कोटी कॅनेडियन

कोकण रेल्वेचा फुकट्या प्रवाशांना दणका

वर्षभरात २० कोटींचा दंड वसूल मुंबई : कोकण रेल्वेचा प्रवास अधिक सुरक्षित, सुरळीत आणि आरामदायी व्हावा यासाठी