Ratnagiri ST Accident : मंडणगडच्या शेणाळे घाटात दाभोळ मुंबई एसटीचा भीषण अपघात!

रत्नागिरी : मंडणगडच्या शेणाळे घाटात लालपरीचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही बस रात्रीच्या सुमारास दाभोळवरून मुंबईच्या दिशेने येत होती. घाटातील उतारावरून जात असताना चालकाचे बस वरील नियंत्रण सुटून बस घरंगळत दरीत कोसळली. मात्र त्या ठिकाणी असलेल्या एका झाडामध्ये एसटी अडकली आणि त्यामुळे मोठे संकट दूर झाले. असे असले तरी या दुर्घटनेत ७ प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार एसटी प्रवाशांना घेऊन मंडणगड शेणाळे घाटातून जात होती. या घाटात अति तीव्र वळण असल्याने यापैकी एका उतारातून जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. आणि गाडी दरीच्या दिशेने घरंगळत गेली. दैव बलवत्तर म्हणून तिथे असलेल्या झाडझूडपांमध्ये अडकली. बस वेगाने जात असल्याचा प्रवाशांना अंदाज आल्याने प्रवाशांना जाग आली. आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी हे दृश्य पाहून बचाव पथकाला कळवले. यानंतर बचाव पथकाने घटनास्थळी दाखल होऊन एसटीतील ४१ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. या ४१ प्रवाशांपैकी ७ प्रवासी गंभीर जखमी असल्याचे कळते आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

Comments
Add Comment

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा; दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’

मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी आपण सगळेच सज्ज झाले आहोत.

Gyan Bharatam project : ज्ञानभारतम् प्रकल्पाची सुरुवात; देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

मुंबई : भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचा अमूल्य ठेवा असलेल्या हस्तलिखितांचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी

‘अलबत्या गलबत्या’ टीमच्या गाडीचा अपघात; दोन जखमी

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात मंगळवारी सकाळी ‘अलबत्या गलबत्या’ नाट्यसंघाच्या गाडीला अपघात झाला.

ॲमेझॉन एअर ने आता ५ पट वेगाने डिलिव्हरी होणार

नवी दिल्ली : ॲमेझॉन एअरची ईशान्य भारतात सेवा विस्तारत असल्याची घोषणा करण्यात आली. या अंतर्गत नवीन कार्गो मार्ग हे