ठाणे : १८ वर्षाखालील मुलांच्या हातात गाडी देऊ नका असे सतत आवाहन पोलीस करत असतात. तरीही पालकांनी आपल्या पाल्याच्या हातात गाडी दिल्यास पालकांवर गुन्हा दाखल होतो. असे असूनही असे अनेक प्रकार आजूबाजूला घडत आहेत. असाच एक प्रकार ठाण्यात घडला आहे. ठाण्यात १५ वर्षाच्या मुलाने २ रिक्षांना उडवल्याचा भीषण प्रकार घडला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ठाण्यातील घोडबंदर आनंद नगर येथे मध्यरात्री १५ वर्षाच्या मुलाने पिकअप चालवत रिक्षाला धडक दिली. रिक्षाला धडक देऊन १५ वर्षीय मुलगा चालवत असलेले पिकअप खड्ड्यात पडले. मेट्रोच्या कामानिमित रस्त्याच्या बाजूला खोदलेल्या खड्ड्यामध्ये पडून हा अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर मुलाच्या आईवडिलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…