Thane Accident : १५ वर्षीय मुलाने पिकअप चालवत दोघांना चिरडले

ठाणे : १८ वर्षाखालील मुलांच्या हातात गाडी देऊ नका असे सतत आवाहन पोलीस करत असतात. तरीही पालकांनी आपल्या पाल्याच्या हातात गाडी दिल्यास पालकांवर गुन्हा दाखल होतो. असे असूनही असे अनेक प्रकार आजूबाजूला घडत आहेत. असाच एक प्रकार ठाण्यात घडला आहे. ठाण्यात १५ वर्षाच्या मुलाने २ रिक्षांना उडवल्याचा भीषण प्रकार घडला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.



ठाण्यातील घोडबंदर आनंद नगर येथे मध्यरात्री १५ वर्षाच्या मुलाने पिकअप चालवत रिक्षाला धडक दिली. रिक्षाला धडक देऊन १५ वर्षीय मुलगा चालवत असलेले पिकअप खड्ड्यात पडले. मेट्रोच्या कामानिमित रस्त्याच्या बाजूला खोदलेल्या खड्ड्यामध्ये पडून हा अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर मुलाच्या आईवडिलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.

Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच