Amravati : अमरावतीत विषबाधा! १००हून अधिक महिला रुग्णालयात

अमरावती : सध्या राज्यभरात विषबाधा होण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशातच अमरावती जिल्ह्यातून धक्कायक बातमी समोर आली आहे. अमरावतीमध्ये एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या तब्बल १००हून अधिक महिलांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. (Women Poisoned In Amravati)



मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी अमरावतीच्या जवळ असणाऱ्या नांदगाव पेठ एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या महिला नेहमीप्रमाणे कामात हजर झाल्या. त्यानंतर त्यांनी कंपनीत उपलब्ध असणारे पाणी प्यायल्यानंतर काही महिलांना मळमळ जाणवू लागली. मात्र वातावरणातील फरकामुळे होत असावं या कारणामुळे अनेक महिलांनी याकडे दुर्लक्ष केले.
परंतु काहीवेळाने एकामागोमाग एक सर्व महिलांना असा त्रास जाणवू लागला. एकाच वेळी तब्बल १०० हून अधिक महिलांना हीच समस्या जाणवू लागल्याने कंपनीने गंभीर दखल घेत तातडीने सर्व पीडित महिलांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर या सर्व महिलांना विषबाधा झाल्याचे उघडकीस आले.


दरम्यान, सध्या अमरावतीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात महिलांवर उपचार सुरु आहेत. मात्र हा त्रास नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचे स्पष्ट कारण अद्यापही समोर आलेले नाही. (Women Poisoned In Amravati)

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात