बीड पुन्हा हादरलं! संतोष देशमुखांनंतर परळीत आणखी एका सरपंचाचा अपघाती मृत्यू

  71

बीड : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने राज्य हादरले आहे.अशातच आता परळीजवळ अजून एका सरपंचाचा मृत्यू झाला आहे.परळीजवळ एका टिप्परने दुचाकीस्वार सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांना उडवल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अभिमन्यू क्षीरसागर हे सौंदाना गावाचे सरपंच आहेत. सरपंच अभिमान क्षीरसागर हे परळीवरून शनिवारी रात्री काम आटपून दुचाकीने गावाकडे निघाले होते. मिरवट येथे त्यांच्या दुचाकीला टिप्परनं धडक दिली. यावेळी अभिमन्यू क्षीरसागर जोरात धडक बसल्याने रस्त्याच्या कडेला पडले. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता कि, क्षीरसागर यांच्या दुचाकीचा चेंदामेंदा झाला आहे.या अपघातानंतर टिप्पर चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याचे सांगितले जात आहे. सरपंच क्षीरसागर यांच्या मृत्यूची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. तसेच घटनास्थळी परळी ग्रामीण पोलीस दाखल झाले. हा अपघात आहे की घातपात याचा आता पोलीस तपास करत असून अभिमन्यू क्षीरसागर यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात हलवण्यात आला.



बीडमधील राखेचे अवैध व्यवसाय होत असल्याचे आरोप होत असताना सरपंचाचा अपघाती मृत्यू झाल्याने सध्या एकच खळबळ उडाली आहे.त्यानुसार हा अपघात की घात होता, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, एकीकडे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यातच आता आणखी एका सरपंचाचा भरधाव टिप्परनं दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. या घटनेनंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित