‘इमर्जन्सी’ विरोधी आंदोलन हा अस्मितेचा विषय- नितीन गडकरी 

नागपूर: ‘इमर्जन्सी’च्या काळात देशात अनेकांनी संघर्ष केला, तुरुंगवास भोगला. या विषयावर चित्रपट आल्याने आणीबाणीचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचेल. आणीबाणीविरोधी लढा हा आमच्यासाठी मनोरंजनाचा नव्हे तर अस्मितेचा विषय आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

खासदार कंगना रानौत अभिनित व दिग्दर्शित ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाचे प्रीमियर शनिवारी नागपुरात आयोजित करण्यात आले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अभिनेत्री कंगना राणावत आणि अनुपम खेर यावेळी उपस्थित होते. नागपूरच्या मेडिकल चौकातील ट्रिलियम मॉल येथील सिनेपोलिस चित्रपटगृहात या प्रेमियरचे आयोजन करण्यात आले. यावेळी आणीबाणीचा काळ अनुभवणारे, त्या काळात तुरुंगवास सोसणारे काही ज्येष्ठ कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.

यावेळी कंगना राणावत म्हणाल्या की, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित लोक प्रिमियरला यावेत अशी माझी इच्छा होती. मी नितीनजी यांना विनंती केली. त्यांनी हे सारे घडवून आणले. नितीनजी असे मंत्री ज्यांना भेटून आपल्या कुटुंबातील व्यक्तीला भेटल्यासारखे वाटते. मी लोकसभा निवडणूक लढले तेव्हाही नितीनजी माझ्या प्रचारासाठी हिमाचल प्रदेश येथे आले. आजही मी त्यांना आवाज दिला आणि ते धावून आले.’

याप्रसंगी अनुपम खेर म्हणाले की, ‘नितीन गडकरी यांना भेटून मला कायम आनंद होतो. आज दिवसभर कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांचा सहवास लाभत आहे. त्यांनी इमर्जन्सी चित्रपटाचे प्रीमियर घडवून आणला, याचा विशेष आनंद आहे. नागपुरातील प्रेक्षक खूप चांगला आहे. त्यामुळे इथून चित्रपटाची चर्चा देशात जाईल. नागपूरकर खऱ्या अर्थाने चित्रपटाचे प्रचारक ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला